Sunday, February 20, 2011

सारांश - भाग १ - The Immortals of Melhua


बृहस्पती आणी शिवा (नीलकंठ) ह्या दोघांमधील हा संवाद:
बृहस्पती म्हणले, वैचारिक पातळीवर सोमरसाचे शरीरातील कार्य सुलभ असू शकेल, परंतू ही महान संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याचे कार्य मात्र ब्रह्मदेवाचे". Aging process काही औषधांनी पुढे ढकलणे कसे शक्य आहे ह्याचा अभ्यास करण्यापूर्वी आपण जिवंत का असतो? अशी कोणती मुलभूत बाब आहे जी आपणाला जिवंत ठेवते? बृहस्पती म्हणले, ही मुलभूत बाब म्हणजेच "उर्जा". जोपर्यंत व्यक्ती जिवंत असते तो पर्यंत बोलताना, चालताना, विचार करताना, कामे करताना आणी झोपेत देखील ह्याच उर्जेचा जिवंत राहण्यासाठी उपयोग होतो. ह्या उर्जेचे स्त्रोत काय? तर आपण जे अन्नपदार्थ सेवन करतो त्या अन्नाचे उर्जेत रुपांतर होते, ती शरीरात साठविली जाते. त्यामुळे काही दिवस आपण पूर्ण उपवास जरी केला तरी आपणाला अशक्त जरूर वाटेल, पण तरीदेखील आपण जिवंत असतो. अन्नपदार्थांपासून ही उर्जा वातावरणातील हवेतील प्राणवायू मुळेच निर्माण होते. त्यामुळे, अन्नपदार्थांचे सेवन करूनही, प्राणवायू अभावी उर्जा निर्माण होणार नाही आणी जिवंत राहण्यासाठी उर्जा नसल्यामुळे मृत्त्यू अटळ आहे. शिवा म्हणला," परंतू ह्या सर्वांचा, aging प्रोसेस, काही औषधांनी पुढे ढकलण्याशी काय संबध आहे?" बृहस्पती हसले आणी म्हणले, "हीच तर खरी गोम आहे, जो प्राणवायू आपणाला जिवंत ठेवतो तोच प्राणवायू aging process आणी मृत्त्यू साठी कारणीभूत आहे. जेव्हा प्राणवायू आणी अन्नपदार्थ ह्यांचा संयोग होवून एका रासायनिक प्रक्रियेद्वारे उर्जा निर्माण होते, त्याच प्रक्रियेतून oxidents हे free radicles शरीरात निर्माण होवून साठविले जातात. जसे लोखंडावर प्राणवायूची प्रक्रिया होवून oxidizing process द्वारे त्यावर जंग (rust) निर्माण होवून हळू हळू लोखंडाची गुणवत्ता कमी कमी होत जाते, एखादे फळ हवेत ठेवले तर ते फळही कालांतराने प्राणवायूच्या प्रक्रियेमुळे खराब होते, सडते, तशीच प्रक्रिया आपल्या शरीरात देखील होते. प्राणवायूच्या प्रक्रियेमुळे निर्माण झालेले हे oxidents हळूहळू शरीरातील पेशींवर विपरीत परिणाम करण्यास सुरवात करतात. लोखंडासारखे आपले शरीरही आतून गंजत जाते, हीच aging प्रोसेस, आणी त्याचा परिपाक म्हणजे मृत्त्यू. जो प्राणवायू आपणाला जीवन देतो तोच प्राणवायू हळू हळू आपणाला मृत्त्युच्या निकट नेत राहतो". ज्याप्रमाणे आपण अन्न, पाणी शरीरात साठवून ठेवू शकतो, ह्या गोष्टी मिळाल्या नाही तरी बरेच दिवस जिवंत राहू शकतो, पण प्राणवायू मात्र साठवून ठेवू शकत नाही, काही मिनिटातच प्राणवायू अभावी मृत्त्यू अटळ आहे. कदाचित साठविलेला प्राणवायू हे शरीरासाठी विष ठरेल म्हणूनच निसर्गाने ही किमया केलेली असावी.
बर्याच शास्त्रीय अभ्यासांती ब्रह्मदेवानी सोमरसाचा शोध लावला. सोमरस प्राशन केल्यानंतर शरीरातील oxidents सोबत ह्या सोमरसाची प्रक्रिया होवून हे प्राणघातक oxidents घामाद्वारे किंवा लघविद्वारे विसर्जित केले जातात. सोमरसाचे एका विशिष्ठ कालाविधीनंतर नियमित प्राशन केल्यास aging process आणी मृत्त्यू ही प्रक्रियाच लांबते हाच ब्राह्म्देवांचा शोध. अमिष ह्या कोलकाता येथील IIM संस्थेतून पदवी प्राप्त केलेल्या लेखकाने लिहिलेल्या "The Immortals of Melhua " ह्या पुस्तकातील वरील सोमरसाची पार्श्वभूमी.

राम हा एक सूर्यवंशीय रजा, ज्याने आपल्या प्रजेसाठी आचार विचारांची एक दिशा ठरवून दिली, ज्या प्रदेशात हे रामराज्ज्य अस्तित्वात होते त्या प्रदेशाला लेखकाने "meluha " म्हणून संबोधित केले आहे आणी राजधानी देवगिरी. सोमरसाचा शोध तर ब्रह्मदेवानी लावला परंतू त्याची निर्मिती कोठे करावी जेणेकरून त्याचा दूरूपयोग होणार नाही, म्हणूनच नीती आणी अचार विचारांनी परिपक्व असणारया सूर्यवंशीय meluha ह्या राम राज्ज्यातील मंदार पर्वताची निवड करण्यात आली. बृहस्पती हे ह्या निर्मिती कारखान्याचे प्रमुख. सोमरसाच्या निर्मितीसाठी आवश्यक वनस्पती, संजीवनी वृक्ष मंदार पर्वतानजीकच्या अर्रण्यात भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्यामुळेच ह्या जागेची निवड. फक्त सरस्वती नदीच्या पाण्याचाच उपयोग सोमरस निर्मितीसाठी होणार असल्यामुळे, मोठ्या कालव्याद्वारे सरस्वतीचे पाणी आणण्यात आले.

सोमरस सेवन केल्यानंतर बर्याच कालावधीपर्यंत विसर्जित होणारा घाम आणी मल- मुत्र ह्यात फार मोठ्या प्रमाणात oxidents असल्यामुळे, आणी ह्या विसर्जनाची योग्य विल्हेवाट न लावल्यास त्याचा शरीरावर आणी त्याच्या सान्निध्यात येणाऱ्या लोकांवर विपरीत परिणाम होणार हे जाणून, व्ययक्तिक स्वच्छता, रोज दोन वेळा स्नान करणे ही सूर्यवंशीयांची सवय, सांडपाण्याची मोठ मोठ्या बंद नाल्या निर्माण करून योग्य विल्हेवाटलावणे हे राजाचे कर्त्तव्य.
अभिमान वाटावे असे रामाने निर्माण केलेले सूर्यवंशीय राज्ज्य. नंतरच्या अनेक पिढ्यातील सूर्यवंशीय राजांनी ही परंपरा जोपासलेली, परंतू हळू हळू ही परंपरा नष्ट होईल काय ह्या भीतीने धास्तावलेले दक्ष (पुस्तकात रामाचा वंशज म्हणून दक्ष राजाचा उल्लेख आहे, दक्ष राज्याचे वय १८८ वर्ष आणी दक्ष राजाची पुत्री म्हणजे सती किंवा पार्वती - वय - ८८). भीती वाटण्याचे महत्वाचे कारण म्हणजे सरस्वती नदीच्या पाण्याचा सतत कमी होत असणारा स्त्रोत. शिवाय शेजारच्या चंद्रवंशीय आणी नागा राज्ज्यकर्त्यांचे सतत होणारे आक्रमण. ह्या सर्व परिस्थितीवर फक्त एकाच व्यक्ती तोडगा काढू शकेल ज्या व्यक्तीचा गळा सोमरसाचे सेवन केल्यानंतर निळ्या रंगाचा होईल. तिबेट मधील मानसरोवर परिसरातील क्षेत्रात अनेक आदिवासी टोळ्या राहत होत्या. अश्याच एका टोळीचा शिवा हा नायक. सूर्यवंशीय राज्याचे मुख्यालय म्हणजे देवगिरी (सात नद्यांचा हा प्रदेश - गंगा, यमुना, सरस्वती, सिंधू, ब्रह्मपुत्रा, शरयू आणी दक्षिणेची राज्याची हद्द म्हणजे नर्मदा). मेलुहा प्रदेशाचा प्रधान म्हणजे "नंदी" . तो शिवाला त्याच्या टोळीसह मेलुहा राज्यातील श्रीनगर येथे घेऊन येतो. सर्व पाहुण्यांना सोमरस दिल्यानंतर, फक्त शिवा सोडून सर्वाना फार त्रास व्हायला लागतो. फक्त शिवाला मात्र काहीच त्रास होत नाही, किंबहुना सोमरस पिल्यानंतर त्याचा कंठ नेहमीचा निळा होतो. हाच तो नीलकंठ, सूर्यवंशीयांना वाचविणारा, म्हणून नंदी त्याला देवगिरी राज्यात घेवून येतो. सोबत शिवाचा मित्र वीरभद्र हा देखील असतो.

आपण सर्वांनी ऐकलेल्या पौराणिक कथांच्या अगदी वेगळे असे हे कथानक. बर्याच गोष्टी अत्तर्क्य, अनाकलनीय, विश्वास न पटण्यासारख्या, तरी देखील, पुस्तकातील राम राज्याची, सोमरसाची संकल्पना विचार करण्यासारखी. आणी अगदी पहिल्या पानापासून वाचतच राहावं असे वाटणारे हे कथानक. सोमरसाची निर्मिती केल्यानंतर त्याचा दूरूपयोग होऊ नये म्हणून ब्रह्मदेवाने केलेली उपाययोजना आणी त्याच अनुषंगाने नंतर रामाने अमलात आणलेली चातुरवर्ण्य पद्धती ह्या बाबत वाचा माझा पुढील लेख ..

16 comments:

  1. Thanks Siddharam.pl forward this to your friends if you can.

    ReplyDelete
  2. :-)छान
    माझ्या ब्लॉगचा पत्ता:http://prashantredkarsobat.blogspot.com/

    ReplyDelete
  3. Thanks Prashant,and if you like it please forward this to your friends. I will read your block.

    ReplyDelete
  4. dear prakash
    very nice. keep it up. very novel story and entertaining.waiting for the next blog
    dr. dilip v. kaundinya

    ReplyDelete
  5. Thanks Dr. Kaundinya Sir. Please forward the link to your firends also.

    ReplyDelete
  6. Prabhakar Sanap: One starts believing on Somras concept in context to oxidation theory. Very well written. We are proud of you Prakash

    ReplyDelete
  7. खूप नवीन माहिती मिळाली. तुमचा ब्लॉग अभ्यासपूर्ण आहे.

    ReplyDelete
  8. @K2: Thank you very much on your encouraging comments. I would request you to share link to this blog to your friends also.

    ReplyDelete
  9. What an excellent and absorbing writing skills on a very different subject. Congrats and continue: Nilesh

    ReplyDelete
  10. डॉ प्रभाकर सानपFebruary 25, 2011 at 8:23 AM

    प्रिय प्रकाश देव (मेलूहा) बृहस्पती आणी शिव संवाद पौराणिक संदर्भ वाच्यार्थाने योग्य आहे परंतु तत्त्वज्ञानात्मक गुह्य अर्थ हा अतिशय वेगळा असा आहे . अध्यात्मिक परिभाषा ही आत्मसाक्षात्कारमूलक असल्यामुळे ती सद्गुरु कृपेवीण समजणे महादुस्तर असते .
    डॉ प्रभाकर सानप

    ReplyDelete
  11. Suyash: Very unusual for a medical doctor like having such a good writing skills. All your articles are not only good but also communicate a message. Pl continue.

    ReplyDelete
  12. Lachchhu: Deva, really surprised, out of ur busy schedule I wonder when u get time to read and write. A different but excellent article

    ReplyDelete