Saturday, March 5, 2011

सारांश - भाग 2 - The Immortals of Melhua

सोमरस, रामराज्य आणी चातुरवर्ण्य पद्धती
सोमरसाची संकल्पना आणी त्याची निर्मिती करण्याचा शोध लावणारा ब्रह्मदेव एक महान शास्त्रज्ञच. सोमरसाचा स्वतःसाठी उपयोग न करता समाजाच्या भल्यासाठी उपयोग कसा करता येईल आणी दुष्ट प्रवृत्तीचे लोक ह्याचा दुरुपयोग कसा करणार नाहीत आणी त्यावर नियंत्रण राखण्याकरिता ब्रह्मदेवाने केलेले कार्य नियोजन:
सर्व प्रदेशांमध्ये एक सखोल सर्वेक्षण करून भारताच्या सात विभागातून प्रत्येकी एक ह्या प्रमाणे अतिशय शीलवान, चारीत्र्य्पूर्ण अश्या सात तरुणांची निवड केली. स्वतःच्या गुरुकुलात समाजाच्या भल्यासाठी निरपेक्षरित्या साततत्याने कार्य करण्याची मानसिकता आणी कठोर प्रशिक्षण त्यांना दिले. Superhuman intelligence असणारे, समाजाला योग्य वर्तणुकीची दिशा दाखविणारे, कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता समाजाची सेवा करणारे, प्रत्येक प्रदेशातील एक असे हे सात ऋषी, म्हणजेच सप्तऋषी. वर्तणुकीचे अतिशय कठोर असे नियम त्यांना घालून दिले आणी नंतर त्यांनाच फक्त सोमरस प्राशन करण्याची अनुमती दिली. सप्तऋषीनी हळू हळू ब्रह्मदेवाच्या ह्या सर्व निकषानुसार नवीन नवीन तरुणांना आपल्या पंथात सामावून घेतले, त्यांना कठोर प्रशिक्षण दिले, आणी हा ब्रह्मदेवाचा पंथ किंवा ब्राह्मण म्हणून ओळखला जावू लागला. ह्या तरुणांमध्ये क्षत्रिय तथा इतर तरुण देखिल असायचे. कालांतराने, दुर्दैवाने, ह्यातील काही लोकांनी त्यांची आचारसंहिता विसरून, साधन, संपत्ती जमविण्यास सुरवात केली, सोमारसामुळे प्राप्त झालेल्या अतिरिक्त शक्तीचा दुरुपयोग करून लढाया करून आपआपली साम्राज्ये निर्माण केलीत. ब्राह्मणांमध्येसुद्धा त्यांच्या श्रेष्ठ्तेनुसार गरुड, मोर, हंस असे वर्ग होते. अहंकारामुळे स्वतःला अतिशय श्रेष्ठ् समजून त्यांनी क्षत्रिय, वैष ह्या वर्गातील श्रेष्ठ्, ज्ञानी, जबाबदार अश्या व्यक्तींची अवहेलना करण्यास सुरवात केली. ह्या सर्व प्रकारातून समाजात असहकार आणी बेबंदशाही निर्माण व्हायला लागली. शिवाय प्रत्येक समाजातील फक्त काही विशिष्ठ लोकानाच ह्याचा फायदा होत गेला आणी त्यांचीच फक्त उन्नति होत गेली. ह्या सर्व पार्श्वभूमीवर रामाने निर्माण केलेली आणी काटेकोर पणे आचरणात आणलेली चातुरवर्ण्य पद्धती कशी होती बघूया:
IIM कोलकाता येथून पदवी प्राप्त केलेल्या आमिष ह्या लेखकाने लिहिलेल्या "The Immortals of Meluha" ह्या पुस्तकातील हा सारांश. ही कोणतीही पौराणिक कथा किंवा पौराणिक कथांचे विश्लेषण नसून, वाचल्याशिवाय कळणारच नाही अशी कादंबरी.
रामाच्या असे लक्षात आले की, ह्यामुळे जातीव्यवस्था अधिकच बळकट होत आहे. ब्राह्मणांची मुले ब्राह्मण, क्षत्रियांची मुले क्षत्रिय, वैशांची मुले वैश, हीच परंपरा, ह्यात त्यांच्यातील गुणवत्तेचा, क्षमतेचा कोणताही विचार नाही. एख्याद्या ब्रह्मणाचा निर्बुद्ध मुलगाही ब्राह्मण तर एखाद्या क्षुद्राचा आतिशय हुशार, सर्व गुणवत्ता असणारा मुलगाही क्षुद्र. केवळ कर्मावर आधारित जात का नसावी हा रामाचा विचार आणी त्याने तो आमलात आणण्यास सुरवात केली. जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाचा पालक म्हणजे राजा. ह्याकरिता रामाने काय केले? नर्मदा नदीच्या किनारी सर्व सोयीनी अध्यायावत अश्या एका फार मोठ्या रुग्णालयाची निर्मिती केली. ह्या रुग्णालयाचे नाव "माहेर". कोणत्याही जातीची असोत, संपूर्ण राज्यातील कोणतीही महिला गर्भवती असताना शेवटच्या तीन महिन्यात तिने "माहेर" मध्ये दाखल झालेच पाहिजे, हा आदेश आणी त्याची काटेकोर अंमलबजावणी. ह्यात श्रीमंत/गरीब असा कोणताही भेदभाव नाही. सर्वांच्या प्रवासाची व्यवस्था. महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या जवळ कुटुंबातील कोणीही व्यक्ती असणार नाही. त्या महिलेची संपूर्ण काळजी रुग्णालयातील प्रशिक्षित कर्मचारी घेणार. प्रसुतीनंतर काही कालावधी नंतर (४-६ महिने), ती महिला एकटीच तिच्या घरी परत जाणार. येथे जन्मलेल्या मुलांना आपले आई-वडील कोण आहेत, आपली जात कोणती? किंवा येथे जन्मलेल्या मुलांपैकी आपला मुलगा किंवा मुलगी कोणती? हे कोणालाच ठाऊक नाही. ह्या सर्व मुलांच्या आरोग्याची, विकास-वाढीची जबाबदारी राजाची. थोडी मोठी झाल्यानंतर त्यांना जवळच असणारया गुरुकुलात दाखल केले जाणार. त्यामुळे ह्या मुलांमध्ये कोण ब्राम्हणाचा, क्षत्रियाचा कि क्षुद्राचा, श्रीमंताचा कि गरीबाचा कोणालाच माहित नाही. सर्वाना सारखीच वागणूक आणी सारख्याच सोयी सवलती. ह्या सर्व मुलांचे मुलभूत शिक्षण झाल्यानंतर, त्यांच्या कला गुणवत्तेचा काटेकोर अभ्यास करून, त्या क्षेत्रात पारंगत होण्यासाठी गुरुकुलात त्यांना आवश्यक सर्व प्रशिक्षण दिले जाणार. युवावस्थेत पदार्पण केल्यानंतर ह्या प्रत्येक तरुणाला सोमरस दिला जाणार. १५ वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांची परीक्षा घेतली जाणार आणी ह्या परीक्षेच्या निकालावर आधारित त्यांना ब्राम्हण, क्षत्रिय, वैष, क्षुद्र ह्या जाती व्यवस्थेत वर्गीकरण केले जाणार. नंतर पुन्हा त्यांना जाती व्यवस्थेवर आधारित विशेष प्रशिक्षण दिले जाणार आणी त्यांना त्यांच्या वर्ण व्यवस्थेची ओळख म्हणून एक उपर्ण दिले जाणार. ब्राम्हनासाठी पांढरे, लाल क्षत्रीयासाठी, हिरवे वैशाकरिता आणी काळे क्षुद्राकरिता. रामाच्या दृष्टीकोनातून वर्ण म्हणजे रंग, जात नव्हे. पालकांनी नंतर मुलांसाठी अर्ज करायचा. ब्राह्मण पालकांना संपूर्ण ब्राह्मण वर्णातील एक मुलगा randomly दिला जाणार, त्याच प्रमाणे क्षत्रिय पालकाला क्षत्रिय वर्णातील एक मुलगा. हा मुलगा नंतर त्यांच्या पालकांकडे त्यांच्या मुलासारखाच वाढणार आणी त्याला सर्व मुलाचेच हक्क मिळणार. ह्या व्यवस्थेमुळे एखाद्या क्षुद्र मातेचा मुलगा त्याला सर्व सामान संधी उपलब्ध झाल्यामुळे आणी तो खूप हुशार असल्यास तरुणपणी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा वर्ण ब्राम्हण म्हणून निश्चित होणार आणी कोणी तरी ब्राम्हण पालक त्याचे पालकत्व स्वीकारणार. तसेच एखाद्या ब्राह्मण मातेच्या मुलाचे पालकत्व त्या मुलाला शिक्षणानंतर काळा वर्ण मिळाल्यास त्याचे पालकत्व एखादा शुद्र स्वीकारणार. आणी रामाने ही व्यवस्था इतक्या काटेकोरपणे आमलात आणली कि सर्व प्रजाही रामावर खुश होती.
अतिशय अनाकलनीय, बुद्धीला पटणार नाही, तरी देखील विचार करायला लावणारे एक वेगळेच लिखाण लेखकाने ह्या पुस्तकात केलेले आहे.

14 comments:

  1. Sir,
    अतिशय अनाकलनीय, बुद्धीला पटणार नाही, तरी देखील विचार करायला लावणारे एक वेगळेच लिखाण.......
    I have nevever herd or read regarding innovative idea like 'Maher' in Ramrajya. Really, 'Prakashwata' is a treasure of something different..... that is why I like it!
    Rokade

    ReplyDelete
  2. Warn mhanje rang, jaat navhe, what a concept. Very well written: Suresh, continue

    ReplyDelete
  3. An unimaginable/unbelievable concept put forth in the book but you have written it very nicely.Dr.P.K.Joshi

    ReplyDelete
  4. Nilesh wrote, I dont understand, if the concept is taken from references from some mythological books or just an imagination of auther. Highly debatable concept but still very well written,congrats.

    ReplyDelete
  5. Your writing has really created interest to read this book:Vinay

    ReplyDelete
  6. Thanks Vinay I would recommend you to read this book, very interesting

    ReplyDelete
  7. No Nilesh, there are no references in the book, read it and you will enjoy reading.

    ReplyDelete
  8. I wonder when you find time to read books, internalize it and then write. Leave apart the concepts but I must admire your hobby and very good writing skills, I am satish your batchmate

    ReplyDelete
  9. Thank you Satish and hemant for your kind and encouraging words

    ReplyDelete
  10. Sir, i don't know when you find time to read and write out of your busy schedule? We need to learn a lot from you. Your each article gives us a message, sir keep it up - Dr. Ameet

    ReplyDelete
  11. Great Narration of a very serious incident and kudos to Dr. sapkal for showing great presence of mind. Very well written sir.
    Anand kate

    ReplyDelete
  12. Although looks to be therotical, in the present scenario it makes us to think of having such system of providing equal opportunity for development to every one irrespective of caste. Pray God to have again such type of "Ram rajjya" Aniket

    ReplyDelete
  13. Interesting and very well written book. I read it. Bust his next book "Naga" is just OK - Pralhad

    ReplyDelete
  14. सर खूपच छान लिखाण आहे आपले .तुमचा ब्लॉग मराठी ब्लॉग जगत वर दिसला आणि एका दमात मी तो पूर्ण वाचून काढला .सर मला तुमची लेखन शैली खूपच भावली .
    सचिन गवते ,नागपूर

    ReplyDelete