Wednesday, December 12, 2012

Facebook


कधीतरी अगदी फावला वेळ असल्यास Facebook उघडून पाहणारा मी. गेल्या एक महिन्यात मात्र केव्हाही Facebook उघडले कि त्यात एकाच मैत्रिणीचे रोज रतीब  टाकल्यासारखे किमान ६०-७० posts. आणि हे browse करताना फावला वेळ निघून जायचा किंवा काही महत्वाचे interesting posts पहायचे राहून जावयाचे. आणि रात्री १२-- वाजता देखील अगदी नियमित केलेले हे  posts. शेवटी ह्या  मैत्रिणीला "unfriend " करावेच  लागले

मुंबईतील " Universal Addiction Clinic ". ७० वर्षाच्या एका महिलेची  Clinic मध्ये entry. Clinic मध्ये नीरनिराळे कक्ष. Heroin Addiction Department, Alcohol Addiction Department, Smoaking Addiction Department (SAD ), Facebook Addiction Department (FAD). सर्वात जास्त गर्दी FAD मध्ये. waiting room मध्ये ३५-४० लोक बसलेले. ही महिला देखील ह्याच कक्षात जाऊन बसली. बसलेल्या सर्वांची डोकी blackberry किंवा iphone मध्ये  घातलेली. २० वर्षांचा एक तरुण, चेहरा दोन्ही हातांनी झाकून जमिनीवर पालथा पडलेला आणि एक स्त्री त्याची सांत्वना करीत असलेली, "बाळा, असे काही करू नकोस, सर्व काही ठीक होईल".  बाळाची आपल्याच मनाशी बडबड सुरु, "मला समझतच नाही, माझे updates, like करण्या सारखे असतानाही एकही मित्राने like चे button press केले नाही". हे अस कधीपासून झालंय, त्या महिलेने विचारले? " मिनिटांपासून", बाळाचे उत्तर, जणू काही - महिने झाल्यासारखे

त्या ७० वर्षाच्या महिलेच्या नावाचा पुकारा झाला आणि ती आत गेली. समीर दिघे हे FAD counselor. हसून स्वागत केल्यानंतर, general चर्चा झाल्यानंतर समीर ने विचारले, "तर मग,Mrs. Arora, हे अस कधीपासून सुरु झालंय?"

Mrs. Arora: ह्याला सर्वस्वी माझा नातू जबाबदार आहे. Facebook वर join होण्यासाठी त्याने मला invitation पाठविले. मी हे आधी कधीच ऐकले नव्हते, नेहमीच माझा चेहरा पुस्तकात दडलेला असावयाचा, हे काही तरी नवीन आहे, आणि नंतर त्यानेच माझे  Facebook account  देखील open करून दिले, म्हणले चला, एक नवीनच अनुभव घ्यावयाला काय हरकत आहे!

समीर: किती वेळ तुम्ही  Facebook वर असता

Mrs. Arora: विशेष नाही पण १४-१५ वेळा तरी Facebook open करते आणि प्रत्येक वेळी ३०-३५ मिनिटे तरी बघते. रात्री देखील रोज - वेळा Facebook open करावे लागते, माझे काही मित्र अमेरिकेत आणि इतर देशात देखील आहेत ना! त्यांची posts बघावयास नकोत का?. माझ्या नवऱ्याला मात्र हे काहीच आवडत नाही, तो म्हणतो, " friendship is a precious treasure and it should not  be outsourced", मूर्ख, बावळट, मागासलेला कुठला!

समीर: Facebook बाबत तुम्हाला काय आवडते?

Mrs. Arora: खऱ्या  अर्थाने मला आता जीवन जगत असल्यासारखे वाटतंय. खऱ्या दुनियेत माझ्या फक्त - मैत्रिणी आहेत, पण  Facebook वर मात्र आता माझे ७१२ मित्र/मैत्रिणी आहेत. Juan Colos हा देखील माझा मित्र आहे

समीरहा Juan Colos कोण?

Mrs. Arora: मला देखील माहित नाही, पण फार प्रसिद्ध व्यक्ती असावी, कारण त्याचे ४००० पेक्षा जास्त friends आहेत. Facebook मुळे खूप लोकांशी मी जुळू शकले. आगदी शाळेतले काही वर्गबंधू देखील आता माझे Facebook friends आहेत. गेल्या ५०-६० वर्षात त्यांचेशी काहीही संपर्क नव्हता. त्यांचे आता  Facebook वरील फोटो पाहून, ते आता काय करतात, त्यांचे posts वाचून खूप excited आणि तरुण झाल्यासारखं वाटतंय. ते कुठे फिरावयास जातात, कोणती movies पाहतात, काल कोणत्या hotel मध्ये गेले, हॉटेल च्या मेनू चे फोटो, त्यांच्या नातवांचे फोटो,toilet papers ते कुठे ठेवतात, आणि कितीतरी, बघून, वाचून खूप उत्साह वाटतो. आणि, , मी त्यांचेसोबत  Facebook वर games देखील खेळते. "Mafia Wars" हा माझा आवडता game. I am always Hitman.

समीर: ह्या पैकी काही तुम्हाला प्रत्यक्ष भेटत नाहीत काय?

Mrs. Arora: नाही हो! Facebook वर तर आता भेटणे फारच सोपं झालंय. त्यामुळे गरजच वाटत नाही. आणि, मग,प्रत्यक्ष भेटण्यासाठी आकर्षक कपडे घालणे, makeup करणे, perfume लावणे, आपण आकर्षक दिसावे म्हणून नियमित व्यायाम करणे, ह्या सर्वांची आता गरजच राहिली नाही.   Facebook वर सर्व किती सुंदर आणि आकर्षक दिसतात नाही! कारण प्रत्येकाने आपला एक सुंदर profile picture निवडलेला असतो ना! मी तर माझा सुंदर, आकर्षक फोटो शोधण्यासाठी मी तर - दिवस घालवले, शेवटी beauty parlour मध्ये गेले.

समीर: नंतर एक सुंदर फोटो काढून घेतला असेल नाही?

Mrs. Arora: नाही हो! त्या  beauty parlour मधील एका सुंदर मुलीचा फोटो काढला आणि तो माझ्या profile picture वर upload केला

समीर: तुमच्या मित्रांनी त्या फोटोवर काही comments केल्या नाहीत काय?कारण तुमचे वय आणि फोटो ह्यातील तफावत कोण्या मित्राच्या लक्षात आली नाही काय?

Mrs. Arora: अहो! तीच तर गम्मत आहे. मी स्वतःला इतके सुंदर, आकर्षक आणि fit ठेवण्यासाठी मी काय आहार घेते, कोणता व्यायाम करते, कोणत्या parlour मध्ये जाते, तळवलकर जिम, ह्या सर्वांबाबत मी Facebook वर उपलोड करत असते ना!

समीर: पण, Facebook मुळे  काही समस्या निर्माण होऊ शकते आणि त्याचे निराकरण करण्यासाठी ह्या केंद्रात जाणे गरजेचे आहे असे तुम्हला का आणि केव्हापासुन वाटावयास लागले?

Mrs. Arora: ह्या रविवारी, रात्री मी नेहमीप्रमाणेच  Facebook वर होते. टेबल वर माझ्या नवऱ्याने लिहिलेली चिट्ठी दिसली. "मी दिवसांपूर्वीच घर सोडून निघून गेलेलो असेन, तुझ्या माहिती साठी फक्त" अहो  एका घरात राहताना फक्त एक महिना मी त्यांच्याशी बोललेली नसेन, म्हणून काय असा मुर्खासारखा निर्णय  घ्यावयाचा

समीरबरे, मग, तुम्ही काय केलेत?

 Mrs. Arora: काहीच नाही, " I unfriended him, offcourse"


एक अनुवादित अनुभव. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा  वाईटच. "Facebook" " a love and hate relationship".  

Wednesday, July 18, 2012

महाभारत



देवांची आपसात होणारी बौद्धिक चर्चा आणी त्या चर्चेतून प्राप्त होणारे, जीवनाचा अर्थ समजावून सागणारे संदेश, ह्या  सर्वांचे संकलन म्हणजेच "वेद". ह्या वेदांच्या माध्यमातून आणी ह्या वेदांचे मानवानी आकलन करून, त्यांचा अर्थ समजून एक चांगले अर्थपूर्ण जीवन जीवन जगण्यासाठी, मानवी समाजाची निर्मिती करण्याकरिता देवानी सात ऋषींना पृथ्वीवर पाठविले. ह्या ऋषींनी वेदांच्या तत्वांवर आधारित समाजाची निर्मिती केली. "ब्राम्हण" , "क्षत्रिय", " वैश्य", "शूद्र", हे समाजाचे चार "वर्ण" देखील ह्या  ऋषींनी निर्माण केलेत.  अनेक वर्षे अश्या प्रकारची समाजरचना सुरु होती. त्यानंतर सतत १४ वर्षे फार मोठा दुष्काळ पडला. समाजरचना संपूर्ण कोलमडून पडली. "वेद" आणी त्यांचा अर्थ लोक विसरून गेलेत. १४ वर्षानंतर शेवटी पाउस पडला. 

एका कोळीणीचा (सत्यवती)  मुलगा म्हणजे "कृष्ण द्वैपायन" जे नंतर "व्यास ऋषीं" म्हणून ओळखले गेलेत, त्यांनी पुन्हा सर्व वेदांच्या श्लोकांचे संकलन करण्यास सुरवात केली. सात ऋषींपैकी वशिष्ठ ऋषींचा नातू पराशर ऋषींचा मुलगा हे "व्यास ऋषीं". व्यास ऋषींच्या  जन्माची कथाही फार मजेदार आहे. शंतनू  राजाला गंगेपासून झालेला मुलगा हा गंगापुत्र देवव्रत  (भीष्म). शंतनू  नंतर सत्यवती ह्या  कोळीणीच्या प्रेमात पडला. उपरीचार राजाची सत्यवती ही कन्या. उपरीचार राजा एकदा जंगलात शिकारीला गेला. जंगलात त्याला आपल्या पत्नीची एवढी आठवण आली कि excite होवून त्याचा वीर्यपात झाला. वीर्य वाया जावू नये म्हणून त्याने ते एका पानात जमा केले, पान व्यवस्थित बांधून आपल्या पाळीव पोपटाला ते नेण्यास, आणी, आपल्या पत्नीला देण्याची सूचना केली. पोपट ते वीर्य घेवून उडाला, आकाशात एका ससाण्याने पोपटावर हल्ला केला. पोपटाच्या चोचीतील पानात ठेवलेले वीर्य एका नदीत पडले, नदीतील एका मासोळीने ते सेवन केले (ही मासोळी एक शापित अप्सरा होती).  त्या मासोळीला एक  मुलगा आणी एक मुलगी झाली. मुलाला नंतर  उपरीचार राजाने स्वतः चा मुलगा म्हणून स्वीकार केला, परंतू मुलीचा स्वीकार करण्यास नकार दिला. हि मत्स्यकन्या म्हणजेच सत्यवती. नदीतून  ती एका नावेतून लोकांना एका तीरावरून दुसऱ्या तीरावर नेण्याचे काम करायची. एकदा तिच्या बोटीतून पराशर ऋषीं प्रवास करीत होते. पराशर ऋषींनी सत्यवतीच्या सौंदर्यावर  लुब्ध होवून तिच्यासोबत समागम करण्याची इच्छा प्रकट केली. समागम केल्यानंतर त्यांच्या  सामर्थ्याने क्षणातच सत्यवतीला पराशर  ऋषींपासून पुत्र झाला, हा पुत्र म्हणजेच "व्यास ऋषीं".  नंतर पराशर ऋषींनी सत्यवतीला वर दिला कि तिच्या शरीराचा माश्याचा वास न येता मोहित करणारा सुगंध येईल आणी मुलगा जरी झाला तरी ती तिचे लग्न होईपर्यंत तिचे कौमार्य अबाधित राहील. ह्याच मत्स्यगंधा सत्यवतीचे पुढे राजाशी लग्न होवून ह्या दोघांपासून त्यांना झालेला पुत्र हा राजा "विचित्रवीर्य" आणी  विचित्रवीर्याचे पुत्र हे पांडू आणी धृतराष्ट्र (ह्यांच्या जन्माची देखील एक वेगळीच मजेदार कथा आहे). शंतनुला गंगेपासून झालेला पुत्र देवव्रत हा जेष्ठ पुत्र असल्यामुळे तोच भविष्यात राजा होईल म्हणून लग्न करण्यापूर्वी सत्यवतीने शंतनुला अट घातली कि जर तिचा पुत्र हा राजा होणार असेल तरच ती शंतनूशी विवाह करेल. जेष्ठ पुत्र देवव्रत ला जेव्हा हे कळले तेव्हा त्याने प्रतिज्ञा केली कि सत्यावातीचा पुत्रच राजा होईल तसेच तो आजन्म ब्रह्मचारी राहील जेणेकरून सत्यवतीच्या पुत्राचे पुत्र भविष्यात राजसिंहासन चालवतील. हीच ती भीष्मप्रतिज्ञा. त्यामुळेच देवव्रत पुढे   भीष्म ह्या नावाने परिचित झालेत.  

"व्यास ऋषीं" नंतर "वेदव्यास" ह्या नावाने ओळखू जावू लागले. व्यासांनी सर्व वेदांच्या श्लोकांचे संकलन करण्यास सुरवात केली. देवांची स्तुती करणाऱ्या ह्या श्लोकांचे चार विभाग केलेत, हे चार विभाग म्हणजेच -- "ऋग्वेद", "यजुर्वेद", "सामवेद" आणी "अथर्ववेद". ह्या वेदांतील श्लोकाचा अर्थ अगदी सरळ सोप्या भाषेत, काव्य/कथा स्वरुपात सर्वसामान्य लोकांना समजावा, ही इच्छा त्यांनी देवांपुढे प्रकट केली. व्यासांची संकल्पना मूर्त स्वरुपात साकार व्हावी म्हणून, व्यासांनी कथन केलेले लिहिण्यासाठी गणेशाची नियुक्ती करण्यात आली. व्यासांनी काव्य/कथा स्वरुपात कथन केलेले आणी गणेशाने लिहिलेले काव्य म्हणजे "जय", विजयाचे आख्यान. मुळात  ह्याचे ६ आध्याय  होते, परंतू त्यातील एकाच आध्याय कालांतराने मानावांपर्यंत, व्यासांच्या वैशंपायन ह्या शिष्यामार्फात पोहचला. 

व्यासांनी सांगितलेले आणी गणेशानी लिहिलेले काव्य,  नंतर एका पासून दुसऱ्या पर्यंत पोहचताना त्यात नवीन नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला. कालांतराने "जय" ह्या मुळ काव्याला "विजय" ह्या नावाने ओळखले जावू लागले. भारत राजाने त्यात १००००० श्लोकांचा समावेश करून हेच काव्य नंतर "भरत" नावाने ओळखले जावू लागले. कालांतराने कृष्णजन्माची आणी नंतर कृष्णाच्या अनेक कथांचा ह्यात समावेश करून हे काव्य "महाभारत" म्हणून लोकांपर्यंत पोहचले. 

देवदत्त पटनायक ह्या वैध्यकीय चिकित्सकाने लिहिलेल्या "जय -- महाभारत कथा" ह्या पुस्तकातील महाभारताच्या ग्रंथाच्या निर्मितीची ही कथा. एका वैध्यकीय चिकित्सकाने महाभारतावरील लिहिलेले हे पुस्तक अतिशय सोप्या इंग्रजी भाषेतील असून, सर्वांनी वाचावे असे आहे. महाभारतातील कथांचे अतिशय इंटरेस्टिंग असे वर्णन ह्यात केलेले आहे. ह्याच लेखकाने अशाच प्रकारची पौराणिक कथांवर आधारित ४ पुस्तके लिहिलेली आहेत. 

व्यासांनी  ही कथा त्यांच्या मुलाला देखील सांगितली, ही कथा सांगताना जैमिनी ह्या त्यांच्या शिष्याने देखील ऐकली. परंतु ह्या काव्यांचा अर्थ न समजल्यामुळे जैमिनी अर्थ समजावून घेण्यासाठी मार्कंडेय ऋषींकडे गेला. परंतु ऋषींनी मौनव्रत धारण केल्यामुळे, त्यांच्या  शिष्याने  एक पक्षाकडे जैमिनीला जाण्याची सूचना केली (त्या काळी असे पक्षी म्हणजे गंधर्व किंवा अप्सरा, देवांच्या शापाने पक्षी झालेले असायचे, परंतू त्यांना मानवासारखे बोलता यायचे).  पुन्हा एक गमतीदार कथा .... महाभारताचे युध्द सुरु असताना ही पक्षिणी आकाशात उडत होती. तिच्या पोटात चार अंडी होती. युध्द सुरु असताना एक बाण ह्या पक्षिणीच्या पोटात शिरून तिचे पोट फाटले आणी त्यातील चार अंडी जमिनीवर पडली. जमिनीवर रक्त-मासांचा आणी हत्ती, घोड्यांच्या विष्टेचा चिखल झालेला होता म्हणून अंडी फुटली नाहीत. त्यातून पिले बाहेर निघाली. त्यांच्या आईने ही अंडी पोटात असताना व्यासांचे " जय" काव्य आणी त्यांचा अर्थ ह्या अंड्यातील गर्भाना सांगितला होता. ह्या पिल्लांनी नंतर संपूर्ण १८ दिवसांच्या महाभारताच्या युद्धाचे प्रत्यक्षदर्शी वर्णन आणी "जय" काव्य जैमिनीला समजावून सांगितले. त्यामुळे नंतर व्यास ऋषींनी सांगितलेल्या "जय" काव्यात महाभारताच्या युद्धाचा देखील समावेश करण्यात आला. ह्याच पुस्तकात  महाभारतातील पौराणिक कथांकडे भारतातील प्रत्येक राज्ज्यात कश्या दृष्टीकोनातून बघितल्या जाते ह्याचे देखील उत्तम विश्लेषण केलेले आहे.