Saturday, January 1, 2011

अकाली टक्कल - तरुणांसाठी आशेचा किरण


मध्यंतरी एक बातमी वाचली. केरळ येथील एका व्यक्तीने वनस्पतींचा अभ्यास करून एक तेल तयार केले आहे. १५ दिवसातून एकवेळा फक्त १० मिनिटे ह्या तेलाने टकलावर ६ महिने सतत मालिश केल्यास टक्कल नाहीसे होते, हा नवीन शोध. देशातील सर्वोच्य अश्या वैज्ञानिक संस्थेने ह्या तेलाचा शास्त्रीय अभ्यास करून हे तेल अतिशय परिणामकारक असल्याची आणी ह्या तेलाच्या मालिश चा आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नसल्याची ग्वाही दिली. बातमी वाचून एक विचार आला? खरोखर तरुणांना पडणारे अकाली टक्कल, एक आरोग्यविषयक किंवा सामाजिक समस्या असेल काय? आणी असल्यास ह्यावर एखादा राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविणे शक्य होईल काय? बराच अभ्यास केल्यानंतर ही समस्या किती गंभीर आहे ह्याची माहिती मिळाली, त्यातील काही निष्कर्ष:
१. अकाली टक्कल - तरुणांमध्ये निर्माण होणारया मानसिक विकृतीचे महत्वाचे कारण. टक्कल असणारे तरुण जेव्हा सुंदर केस असणारया आपल्या मित्रांसोबत तुलना करतात, त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारचा मानसिक न्यूनगंड निर्माण होतो.
२. विवाहाकरिता मुलीने नकार दिलेल्या अनेक कारणांपैकी, तरुणाला असलेले टक्कल हे एक अतिशय महत्वाचे कारण.
३. केवळ टक्कल असल्यामुळे, शिक्षित असूनही तथा आवश्यक सर्व कौशल्य असूनही, नौकरी न मिळाल्याची अनेक उदाहरणे.
४. टक्कल असल्यामुळे त्यांना सतत हिणवत असल्यामुळे, समाजावरील त्यांचा राग आणी त्यातून असामाजिक आचरणाकडे वळण्याची त्यांची वृत्ती.
५. मुंबई येथील एका अभ्यासाचा निष्कर्ष: रस्त्यांवरील अपघातात मृत्त्यू पैकी ६५% टक्कल असणारे (केसांचे आच्छादन नसल्यामुळे हेड इंज्युरीचा जास्त धोका)
६. विवाहित टक्कल असणारया तरुणाला त्याची पत्नी सतत हिणवत असते, प्रणयाचे वेळी तिला त्याच्या केसातून हात फिरविण्याची संधी मिळत नाही .. ह्यातून निर्माण होणारा दुरावा.
७. अर्धवट टक्कल, डोक्यावर थोडेसे केस, आणी ह्या केसांनी सतत टक्कल झाकण्याचा प्रयत्न. त्यामुळे सतत कामाकडे होणारे दुर्लक्ष. किंवा, टक्कल झाकण्यासाठी विगचा वापर, त्याचे वेगळेच टेन्शन (माझ्या एका मित्राचा विग मोटारसायकल चालविताना उडून गेला आणी मागे उभ्या असलेल्या गाई ने खाल्ला)
८. एका अभ्यासाचा निष्कर्ष: ३२% युवकांना अकाली टक्कल
म्हणजे, ही एक निश्चितच आरोग्य विषयक समस्या ठरू शकते. शिवाय, ३२% युवकांना अकाली टक्कल, ह्याचा दुष्परिणाम कंगवे, शाम्पू , तेल ह्यांच्या विक्रीवर. देशाचे आर्थिक नुकसान. म्हाल्यांच्या धंद्यावरही विपरीत परिणाम. आणी, ह्या सर्व विचारातून, अभ्यासातून निर्माण झाला एक राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम " राष्ट्रीय अकाली टक्कल उपचार कार्यक्रम". ह्या कार्यक्रमाची अंमलबजावणीची थोडक्यात रूपरेषा:
१. राष्ट्रीय लसीकरण कार्याक्रसोबातच हा कार्यक्रम राबविला जाणार (कारण लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी १५ दिवसातून एक वेळा गावात जात असतात).
२. जनगणनेच्या वेळी टक्कल असणारया तरुणांची गणना (पूर्ण टक्कल, अधर्वट टक्कल ह्यांचे वर्गीकरण).
३. आरोग्य सेविकेला तेलाचा पुरवठा (वापरा आणी फेका ह्या तत्वावर असणारया १० ml च्या कुप्या).
४. लसीकरण सत्राचे वेळी टक्कल असणारया तरुणांनी येण्याकरिता मोठ्या प्रमाणात आरोग्य शिक्षण मोहीम ( ह्या करिता उत्कृष्ठ घोषवाक्क्ये तयार करणार्यांना विशेष बक्शिश - विचार करा आणी सुचवा चांगली घोषवाक्क्ये) .
५. लसीकरण सत्राचे वेळी १५ दिवसातून एकदा येणाऱ्या टक्कल असणारया तरुणांची आरोग्य सेविकेद्वारे तेलाने १० मिनिटे मालिश. मालिश करण्याकरिता आपल्या मैत्रिणीला आणण्याची तरुणांना मुभा. विवाहित टकले त्यांच्या पत्नी सोबत येतील, सोबत मुलानाही लसीकरणासाठी आणतील)
(थोडा वेळ डोळे बंद करून वरील चित्र आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करा - आहा हा - काय सुंदर चित्र - स्त्रिया मुलांना पोलियो, ट्रिपल च्या लसीकरणासाठी घेवून आलेल्या आहेत, लसी करणानंतर मुले खेळत आहेत, टकल्या नवर्यांना बायका डोक्यावर तेल चोळत आहेत, आरोग्य सेविका काही टकल्या तरुणांचे मालिश करीत आहेत (ह्या प्रसंगातून ह्या टकल्यानंचे आणी आरोग्य सेविकेच्या विवाहाचे योग जुळून येण्याची शक्यता) , काही अविवाहित टकले आपल्या प्रेयसी सोबत आलेले आहेत, कोपर्यात जावून प्रेयसी त्यांना मालिश करीत आहे ...)

राष्ट्रीय अकाली टक्कल उपचार कार्यक्रम - फायदे:
१. लोकांच्या गरजांवर आधारित एकमेव उपचारात्मक कार्यक्रम (बरेच राष्ट्रीय कार्यक्रम प्रतिबंधात्मक आहेत)
२. मालिश चा फायदा दिसत असल्यामुळे, लोकांचा आरोग्य सेवेवरील विश्वास वाढेल, त्यामुळे, इतर आरोग्य कार्यक्रम देखील यशस्वीरीत्या राबविले जातील.
३. उपचार कार्यक्रमामुळे, तरुणांमधील नैराश्यतेचे तथा मानसिक आजारांचे प्रमाणात कमी, असामाजिक आचरणाकडे वळण्याच्या वृत्तीत बदल.
४. मालिश करण्यासाठी तरुण मुलीनी पुढाकार घेतल्यास, प्रेम विवाह आणी हुंड्याचे प्रमाण कमी होण्यास मदत.
५. कंगवे, शाम्पू, तेल ह्यांच्या विक्रीत वाढ होवून देशाची आर्थिक उन्नती.
६. टक्कल नाहीसे झाल्यामुळे अधिक उमेदीने कामावर लक्ष केंद्रित, राष्ट्राच्या विकासात हातभार.
७. तेलाच्या निर्मितीचे गृहउद्ध्योग कारखाने - त्यामुळे राष्ट्राच्या आर्थिक विकासाला हातभार.

टीप: हा लेख वाचून, राष्ट्रीय कार्यक्रमाच्या नियोजनात, अंमलबजावणीत अभिनव कल्पना सुचविणाऱ्या वाचकांना राष्ट्रपती तर्फे पारितोषक दिले जायील.

ताजा कलम: तेलाच्या खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा तथा ह्या तेलाच्या परिणामकारकतेबद्धल विरोधी पक्षांनी आरोप केल्यामुळे, सध्या भारत सरकारने हा कार्यक्रम सुरूच केलेला नाही. कृपया लेख वाचून नाहकच गंभीरपणे विचार करू नका, शिल्लक असलेले केस गळून पडतील.

Sunday, December 26, 2010

अनकॉमन कॉमनसेन्स


मध्यप्रदेशातील भोपाल येथे नौकरी आणी नागपूर येथे कुटूंब. शुक्रवारी रात्री छातीसगड एक्स्प्रेसने भोपाल येथून निघणे, शनिवारी सकाळी नागपूरला पोहोचणे आणी रविवारी रात्री पुन्हा नागपूर येथून निघून सोमवारी सकाळी भोपाल ला पोहोचणे, हा नित्यक्रम. भोपाल येथील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात नौकरी करणारी बरीच डॉक्टर मंडळी ह्या प्रवासात सोबत असतात (ह्या नौकरी ची एक नवीन व्याख्या " MCI professor", म्हणजे फक्त आठवड्यातून एक दिवस किंवा MCI चे inspection असेल तेंव्हाच उपस्थित राहणे, एरवी आपल्या शहरात मस्त practice करणे. काय होत असणार त्या विध्यार्थ्यांचे देवालाच माहित. असो ). अश्याच एका प्रवासात AC III tyre च्या बोगीत

Saturday, December 11, 2010

पैसा गाठी - आरोग्यासाठी !


दोन वर्षांपूर्वी माझ्या आईची नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात angioplasty करण्यात आली.

काही गुंतागुंती निर्माण झाल्यामुळे तिला ५-६ दिवस रुग्णालयातच ठेवण्यात आले होते. त्या कालावधीत मी सतत रुग्णालयात
होतो. इतर रुग्णांच्या नातेवायीकांचे आपसातील संभाषण ऐकणे किंवा त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारणे हा त्या कालावधीतील महत्वाचा विरंगुळा. राजेश अगरवाल (नाव बदललेले) हा मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील अतिशय मध्यमवर्गीय आर्थिक
परिस्थितील गृहस्थ. ७५ वर्षाच्या आल्या आईला ह्याच रुग्णालयात दाखल केलेले. तपासणीअंती डॉक्टरांनी हृदयाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. राजेशचे वडील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, राजेश चे गावात एक छोटेसे किराण्याचे दुकान,
त्यचे लग्न झालेले आणी त्याला दोन मुले. अतिशय सर्वसाधारण अशी आर्थिक परिस्थिती. राजेशच्या आईला मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार, त्यामुळे हृदयाची शस्त्रक्रिया

Saturday, December 4, 2010

कुटुंब नियोजनाकरिता "स्ट्रेपसील्स strategy"


संदेश वहनाच्या प्रक्रियेत संदेश देणारी व्यक्ती आणी सर्वांना समजेल अशी भाषा, ऐकणार्यांची त्या क्षणी असणारी समज आणी मानसिकता अतिशय महत्वाची असते. अन्यथा प्राप्त होणारा संदेश, ह्या संदेशातून समजणारा अर्थ आणी संदेशानुसार अपेक्षित कारवाही ह्यात थोडीशीही तफावत झाल्यास अर्थाचा अनर्थ घडू शकतो.

१९८० च्या दशकाच्या सुरवातीला महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागात एक अतिशय तडफदार, कार्यकुशल आणी कोणत्याही परिस्थितीत नेमून दिलेले उद्दिष्ट पूर्ण झालेच पाहिजे हा आग्रह असणारे एक IAS अधिकारी सचिव ह्या पदावर कार्यरत होते. त्या कालावधीत महाराष्ट्र राज्याला सतत भारत सरकारतर्फे कुटुंब नियोजन कार्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्धल दरवर्षी बक्षीस मिळायचे. परंतु उद्दिष्ट साध्य करताना कामाची गुणवत्ता ह्याकडे मात्र दुर्लक्ष व्हायचे. ह्या सचिवांचे इतरत्र स्थानांतर झाल्यानंतर दुसरे एक IAS अधिकारी सचिव ह्या पदावर रुजू झालेत. पहिल्या दिवसापासूनच निव्वळ आकड्यांपेक्षा कामाची गुणवत्ता जास्त महत्वाची आहे हा महत्वपूर्ण संदेश त्यांनी देण्यास सुरवात केली. साहजिकच काम एकदम कमी झाले. त्या वर्षी कुटुंब नियोजन कार्य अतिशय असमाधानकारक

Sunday, November 21, 2010

शुक्रनाडी छेदन मराठी संगीत सन्दुक तमाशा


१९७८ ते १९८४ ह्या कालावधीत मी नागपूर जिल्ह्यातील कचारीसावंगा ह्या प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी ह्या पदावर कार्य करीत होतो.

१९८० च्या दशकातील सुरवातीला पुरुष नसबंदी एक लोकप्रिय कुटुंब नियोजनाची पद्धत होती. काटोल येथील आठवडी बाजाराचे दिवशी ५०-६० नसबंदी शस्त्रक्रिया व्हायच्या. एक अतिशय गमतीशीर चित्र असायचे ते. १०० ते १५० माणसांची गर्दी, एक छोटासा शामियाना, ४-५ tables रांगेत मांडलेली (नोंदणी, फॉर्म भरणे, शेविंग साठी ठेवलेले समान, नसबंदी नंतर अनुदान वाटपाचे table, औषध वाटपाचे table), loudspeaker वर सुरु असलेल्या annoucements, कुटुंब नियोजनाची गाणी. शस्त्रक्रिया दालनात ३-४ tables वर झोपलेले लाभार्थी, operation च्या साहित्त्याचे drums, इतर साहित्त्य विखुरलेले, एकाच वेळी २-३ सुरु असणारया शस्त्रक्रिया, सिस्टर/attendants ह्यांचा आरडाओरडा,

Friday, November 12, 2010

माझा पहिला परदेश प्रवास


माझा पहिला परदेश प्रवास - एक जीवघेणा अनुभव

"परंपरागत वैद्यक शास्त्राचा प्राथमिक आरोग्य सेवेत उपयोग" ह्या विषयावर अभ्यासाकरता जागतिक आरोग्य संघटनेने मला सप्टेंबर १९८९ मध्ये ५ महिन्यांची फेलोशिप प्रदान केली. ह्या फेलोशिप अंतर्गत मला अमेरिका, जपान, चीन, दक्षिण कोरिया, थायलंड, इंडोनेशिया आणी हॉंगकॉंग ह्या देशात भेटी देवून अभ्यास करावयाचा होता. माझ्यासोबत इतर ५ अधिकारी होते. माझा हा पहिलाच परदेश प्रवास.

सी.ओ. आलेत .......

जिल्हा परिषद म्हणजे काय? जिल्हा परिषदेचे प्रशासन? ह्या सर्व बाबतीत संपूर्ण अनभिज्ञ असलेला मी, १३ जून १९७८ मध्ये नागपूर जिल्ह्यातील कचारीसावंगा ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी ह्या पदावर रुजू झालो. दुसऱ्याच दिवशी काटोल येथे पंचायत समितीच्या कुटुंब नियोजन आढावा सभेस उपस्थित राहावे लागले. नवीन अधिकारी, पदाधिकार्यांच्या ओळखी झाल्यात. बीडीओ, एसडीओ, तहसीलदार, पंचायत समिती सभापती, ही सर्व पदे, त्यांचे कार्य व अधिकार ह्याबाबत माहिती मिळाली. सभेला काटोल नगर परिषदेचे चीफ ऑफिसर (सी.ओ) श्री. पाल्हेवार देखील हजर होते. श्री. पाल्हेवार वर्ग - ३ चे अधिकारी तर मी मात्र वर्ग २ चा अधिकारी, ऐकून उगाच कॉलर टाइट झाली. श्री. पाल्हेवार ह्यांना सर्व सी.ओ. ह्या नावाने संबोधित होते.

२ दिवसानंतर दुपारी quarter मध्ये आराम करीत होते, शिपाई बोलवायला आला.
शिपाई: सर, सी.ओ. साहेब गावात ग्रामपंचायतच्या कार्यालयात आलेले आहेत