Monday, January 17, 2011

पती-पत्नी एकाच नाण्याच्या दोन बाजू


दोन प्रसंग/अनुभव:
प्रसंग १: उच्चमध्यमवर्गीय कुटूंब, लग्नाला १५-२० वर्षे झालेली. ऑफिस मध्ये रजा टाकल्यामुळे पती घरी. छोट्या छोट्या कारणांवरून दोघांमध्ये धूसपूस, आणी रागाने पती बाहेर निघून जातो. घरातील मुलांच्या, सासूसासर्यांच्या जबाबदारया, घरातील कामे, पती समजूनच घेत नाही म्हणून ती देखील रागावलेली. संध्याकाळी तो घरी आला. खोलीत तिला पाहून पलंगावरील नीट असलेली चादर त्याने उगाच पुन्हा नीट केली, मोगरयाची चार फुले तिच्या उशीजवळ ठेवून दिली, आणी म्हणला, चुकलेच माझे, असे वागायला नको होते. ह्या शब्दांनी ती देखील विरघळली आणी म्हणली "अहो कळतोना तुमचा राग आणी धूसपूस, पण दिवसभर सर्वांसाठी राबताना केवळ तुम्हीच एकटे माझे, मग माझाही वैताग मी कोणावर काढणार?" तो म्हणला, " आज रजा होती, वाटल मोकळेपणे जगावे, तुला नाही का वाटत कधी तरी अगदी मोकळ मोकळ व्हावस, झटकून सगळी ओझी एक दिवस तरी दुसऱ्याच जगात जगावस?' ती म्हणली " बघून मोगरयाची ही फुले आणी जाणवणारे तुमचे हे प्रेम मनोमनी, जगतेच तर आहे दुसऱ्या जगात ह्या क्षणी" स्वतःचाच मग त्याला राग आला आणी डोळ्यात अश्रू आले दोन, माझ्याशिवाय हिला समजणारे दुसरे आहे तरी कोण? वाटल होत फुकट गेली आज माझी रजा, पण राग येण आणी नंतर जवळ येण हीच तर जीवनाची खरी मजा"

प्रसंग २: उच्चमध्यमवर्गीय कुटूंब, लग्नाला १५-२० वर्षे झालेली. ऑफिस मध्ये रजा टाकल्यामुळे पती घरी. छोट्या छोट्या कारणांवरून दोघांमध्ये धूसपूस, आणी रागाने पती बाहेर निघून जातो, संध्याकाळी तो घरी येतो आणी टीवी बघत बसतो. ती म्हणते, अहो चुकले माझे, बस झाला ना राग, चला जेवायला. "तूच जेव, खूप काम करतेना तूच एकटी ह्या घरात, मला नाही जेवायचे" (बाहेरून मस्त खाउन आलेलो आहे हे मात्र सांगण्यास विसरलेला). रात्रीचे ११.३०: पलंगाच्या एका कडावर नवर्याकडे पाठ करून झोपलेली ती, डोळे बंद असले तरी आसवं पीत विचार करीत पडलेली, माझे काय चुकले?. पहा ना, कशी मस्त झोपली ही, माझी काळजीच नाही, पलंगाच्या दुसऱ्या कडावर बायकोकडे पाठ करून झोपलेला तो .. उद्याचा दिवस कसा निघणार?

मध्यंतरी एक पुस्तक वाचले "Men are from Mars - Women are from Venus" पुरुष आणी स्त्री भिन्न ग्रहांवरील दोन व्यक्ती, एकंदरीतच दोघांचीही जडणघडण थोडी वेगळी, आणी विवाहानंतर ह्या दोन व्यक्ती एकत्र येणार. एकमेकांच्या समजुतीतील फरक, मतभिन्नता, समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, स्वतः चे अस्तित्व, स्वतः ची वयक्तिक ध्येय, ह्या सर्वांमुळे विवाहानंतर वाद विवाद, कुरबुर, भांडणे ही तर होणारच. मतभिन्नता, वाद विवाद हा विवाहित जीवनाचा एक अविभ्ज्ज्य घटक आहे. अगदी आदर्श विवाहित जोडप्यात देखील असले प्रसंग येणारच, त्यामुळे असले प्रसंग टाळण्यापेक्षा असले प्रसंग निर्माण झाल्यास त्यावर कशी तोड काढावी हे महत्वाचे ठरते.

एरीच फ्रोम म्हणतो: " मी तुझ्यावर प्रेम करतो कारण मला तुझी गरज आहे, ही अपरिपक्व प्रेमाची भाषा, तर मला तू हवी आहेस कारण माझे तुझ्यावर प्रेम आहे, ही परिपक्व प्रेमाची भाषा"
वादविवाद, भांडणावर कशी तोड काढावी ह्यावर अंकगणितासारखे २+२=४ असले उत्तर कुठेही मिळणार नाही. परंतू खालील बाबी लक्षात घेवून दोघांनीही सातत्याने जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास ही विषमता टाळणे शक्य होईल:
१. विषमता निर्माण होणारी चिन्हे आणी लक्षणे ओळखता येणे: काही तरी बिघडले आहे, मानसिक तणाव निर्माण होतो आहे. आणी हे कश्यामुळे असू शकेल ह्याचे निदान करण्याचे कौशल्य निर्माण करणे.
२. वादविवाद, विषमता अधिकच बळावू नये ह्या करिता पुढाकार घेऊन योग्य स्थळ आणी वेळ निश्चित करणे (दोघानाही सोयीची असणारी). पुढाकार कोणी घ्यावा ह्याचा नाहकच prestige issue करू नये.
३. दोघांपैकी कोणीतरी पुढाकार घेऊन ह्या वादग्रस्त विषयाची सुरवात करणे, त्याची पार्श्वभूमी जाणून घेणे, एकमेकांवर दोषारोपण न करता सकारात्मक वातावरणात चर्चा घडवून आणणे, फक्त माझेच नेहमी बरोबर असते हा अहंभाव बाजूला सारणे, शांतपणे ऐकून घेण्याची कला आत्मसात करणे. आणी सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या प्रसंगावर वादविवाद निर्माण झालेला असावा फक्त त्याच विषयावर चर्चा करणे. जुनी पुराणी जळमट, वादविवाद ह्या क्षणी पुन्हा पुन्हा उकरून न काढणे (ह्यामुळे निराशे शिवाय काहीही निष्पन्न होणार नाही)
४. विषमता निर्माण होण्यात आपण स्वतः बर्याच अंशी कारणीभूत होता असे आपल्या मनास वाटत असेल तर, ती जबाबदारी घेवून चुकलेच माझे, मी असे वागायला नको होते ह्या वाक्याने सुरवात करा. पुढील मळभ दूर होण्यास ह्यामुळे निश्चितच मदत होईल.
५. मागील असल्याच प्रसंगात दोघानीही चर्चा करून कशी तोड काढली आणी वाद कसा मिटविला, दोघे एकत्र कसे आलो होतो, ह्या सर्वांची आठवण करून, ह्या अनुभवाचा उपयोग करणे.
६. कदाचितच फक्त एकाच तोडगा दोघानाही मान्य असेल. एका पेक्षा जास्त पर्याय असतील तर दोघानाही कोणता पर्याय मान्य असू शकेल हे जाणून त्यावर सकारात्मक चर्चा करणे.
७. दोघानाही मान्य झालेला तोडगा म्हणजेच वादावर पडदा पडणे. परंतू पुन्हा पुन्हा ह्याच विषयावर विवाद निर्माण होणार नाहीत ह्या करिता जाणीवपूर्वक आपल्या स्वभावात, वर्तणुकीत बदल घडवून आणून ह्या वर्तणुकीत सातत्य राखण्याचा प्रयत्न करणे.
८. विवाद मिटल्याचा क्षण दोघांनीही आनंदाने साजरा करणे (हा कसा साजरा करायचा हे आपणासच शोधायचे आहे). एकमेकांनी केलेल्या प्रयासांची मुक्त कंठाने तारीफ करणे. त्या दिवसाचा वाद शक्यतोवर त्याच दिवशी सोडविण्याचा प्रयत्न करणे.
हे टाळा:
१. दोषारोपण
२. नावे ठेवणे (तू/तुम्ही अशीच आहे/असेच आहात, तू/तुम्ही नेहमीच)
३. आपलाच मुद्धा बरोबर आहे हेच ठासून सांगणे
४. त्याच त्याच जुन्या गोष्टी उकरून काढणे (तू/तुम्ही त्यावेळी अशी/असे वागली/वागले होती/होता)
५. विवाद निर्माण होण्या करिता आपल्या दोघांव्यतिरिक्त इतर व्यक्ती कारणीभूत असल्यास आणी त्या व्यक्ती उपस्थित नसल्यास, त्यांनी कसे वागावे ह्यावर जास्त चर्चा करणे टाळणे. कारण त्यांच्या वर्तणुकीवर आपले विशेष बंधन नसते.
६. विवादाचे स्वरूप गंभीर होण्यापर्यंत न थांबणे.
७. मीच का पुढाकार घ्यावा?
पहिला प्रसंग, छोटे छोटे विवाद, गैरसमजुती मिटविण्याकरिता, काय करता येईल, अगदी छोट्या छोट्या गोष्टी - बरेच काही आपणास शिकवून जातो. आपण प्रत्येकाने लक्षात घ्यावे, पती किंवा पत्नी हे काही दोघांचे शत्रू नाहीत. तुम्ही एकमेकांवर थोडेतरी निश्चितीच प्रेम करता, मग आपल्या प्रेमाच्या व्यक्तीसाठी कोणीतरी पुढाकार घेऊन हा विवाद मिटविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास हे विवादाचे मळभ दूर जाऊन एक सुंदर ताराकांकित आकाश आपणास दिसावयास लागेल आणी उद्याच्या सुंदर ठरणाऱ्या दिवसाकरिता आपण अधिक उमेदीने सामोरे जाऊ.

13 comments:

  1. Vipul: Realistic analysis and suggestions to resolve interspusal issues. Especially, the begining is very well written

    ReplyDelete
  2. Kharokhar vichar karnyasarkha vishay aahe.

    Renu.

    ReplyDelete
  3. Just True . Applicable to all couples .

    Dr Vandana Gandhi

    ReplyDelete
  4. Dear Mama
    I think you should start Family and marital Counselling
    Dr sanjay Deshpande

    ReplyDelete
  5. this is what everyone should accept the real fact of life then only we can get happiness.good artcle to read.abhinandan!!!!----shobha potode

    ReplyDelete
  6. By reading an article and comments about it, it seems that these tips will really help me in my future life.
    Thanks
    Keep it up, bets wishes.

    ReplyDelete
  7. antarmukh howun vichar karayala lawnara ek utkrushth lekh: Subhash

    ReplyDelete
  8. these facts are known all over world but still conflicts occur in practically every couple. the second type of couple are more common than the first one. I feel the reason is personal ego and inability of one of the partner to take a lead and compromise. Such thoughts as what you penned should be regularly imbibed to all the married ones so that the conflicts end in good night times
    sanjiv golhar

    ReplyDelete
  9. Dr.Deshmukh:Deva,after retirement start post marriage counseling clinic. A wonderful article

    ReplyDelete
  10. Cery easy to tell but difficult to practice, still a good reading for making some conscious efforts-Anurag

    ReplyDelete
  11. Yes I agree with you Anurag. Let us make attempts to keep these tips at the back of our conscious mind and make sincere efforts, and its certain that we shall not be loosers

    ReplyDelete