Wednesday, December 12, 2012

Facebook


कधीतरी अगदी फावला वेळ असल्यास Facebook उघडून पाहणारा मी. गेल्या एक महिन्यात मात्र केव्हाही Facebook उघडले कि त्यात एकाच मैत्रिणीचे रोज रतीब  टाकल्यासारखे किमान ६०-७० posts. आणि हे browse करताना फावला वेळ निघून जायचा किंवा काही महत्वाचे interesting posts पहायचे राहून जावयाचे. आणि रात्री १२-- वाजता देखील अगदी नियमित केलेले हे  posts. शेवटी ह्या  मैत्रिणीला "unfriend " करावेच  लागले

मुंबईतील " Universal Addiction Clinic ". ७० वर्षाच्या एका महिलेची  Clinic मध्ये entry. Clinic मध्ये नीरनिराळे कक्ष. Heroin Addiction Department, Alcohol Addiction Department, Smoaking Addiction Department (SAD ), Facebook Addiction Department (FAD). सर्वात जास्त गर्दी FAD मध्ये. waiting room मध्ये ३५-४० लोक बसलेले. ही महिला देखील ह्याच कक्षात जाऊन बसली. बसलेल्या सर्वांची डोकी blackberry किंवा iphone मध्ये  घातलेली. २० वर्षांचा एक तरुण, चेहरा दोन्ही हातांनी झाकून जमिनीवर पालथा पडलेला आणि एक स्त्री त्याची सांत्वना करीत असलेली, "बाळा, असे काही करू नकोस, सर्व काही ठीक होईल".  बाळाची आपल्याच मनाशी बडबड सुरु, "मला समझतच नाही, माझे updates, like करण्या सारखे असतानाही एकही मित्राने like चे button press केले नाही". हे अस कधीपासून झालंय, त्या महिलेने विचारले? " मिनिटांपासून", बाळाचे उत्तर, जणू काही - महिने झाल्यासारखे

त्या ७० वर्षाच्या महिलेच्या नावाचा पुकारा झाला आणि ती आत गेली. समीर दिघे हे FAD counselor. हसून स्वागत केल्यानंतर, general चर्चा झाल्यानंतर समीर ने विचारले, "तर मग,Mrs. Arora, हे अस कधीपासून सुरु झालंय?"

Mrs. Arora: ह्याला सर्वस्वी माझा नातू जबाबदार आहे. Facebook वर join होण्यासाठी त्याने मला invitation पाठविले. मी हे आधी कधीच ऐकले नव्हते, नेहमीच माझा चेहरा पुस्तकात दडलेला असावयाचा, हे काही तरी नवीन आहे, आणि नंतर त्यानेच माझे  Facebook account  देखील open करून दिले, म्हणले चला, एक नवीनच अनुभव घ्यावयाला काय हरकत आहे!

समीर: किती वेळ तुम्ही  Facebook वर असता

Mrs. Arora: विशेष नाही पण १४-१५ वेळा तरी Facebook open करते आणि प्रत्येक वेळी ३०-३५ मिनिटे तरी बघते. रात्री देखील रोज - वेळा Facebook open करावे लागते, माझे काही मित्र अमेरिकेत आणि इतर देशात देखील आहेत ना! त्यांची posts बघावयास नकोत का?. माझ्या नवऱ्याला मात्र हे काहीच आवडत नाही, तो म्हणतो, " friendship is a precious treasure and it should not  be outsourced", मूर्ख, बावळट, मागासलेला कुठला!

समीर: Facebook बाबत तुम्हाला काय आवडते?

Mrs. Arora: खऱ्या  अर्थाने मला आता जीवन जगत असल्यासारखे वाटतंय. खऱ्या दुनियेत माझ्या फक्त - मैत्रिणी आहेत, पण  Facebook वर मात्र आता माझे ७१२ मित्र/मैत्रिणी आहेत. Juan Colos हा देखील माझा मित्र आहे

समीरहा Juan Colos कोण?

Mrs. Arora: मला देखील माहित नाही, पण फार प्रसिद्ध व्यक्ती असावी, कारण त्याचे ४००० पेक्षा जास्त friends आहेत. Facebook मुळे खूप लोकांशी मी जुळू शकले. आगदी शाळेतले काही वर्गबंधू देखील आता माझे Facebook friends आहेत. गेल्या ५०-६० वर्षात त्यांचेशी काहीही संपर्क नव्हता. त्यांचे आता  Facebook वरील फोटो पाहून, ते आता काय करतात, त्यांचे posts वाचून खूप excited आणि तरुण झाल्यासारखं वाटतंय. ते कुठे फिरावयास जातात, कोणती movies पाहतात, काल कोणत्या hotel मध्ये गेले, हॉटेल च्या मेनू चे फोटो, त्यांच्या नातवांचे फोटो,toilet papers ते कुठे ठेवतात, आणि कितीतरी, बघून, वाचून खूप उत्साह वाटतो. आणि, , मी त्यांचेसोबत  Facebook वर games देखील खेळते. "Mafia Wars" हा माझा आवडता game. I am always Hitman.

समीर: ह्या पैकी काही तुम्हाला प्रत्यक्ष भेटत नाहीत काय?

Mrs. Arora: नाही हो! Facebook वर तर आता भेटणे फारच सोपं झालंय. त्यामुळे गरजच वाटत नाही. आणि, मग,प्रत्यक्ष भेटण्यासाठी आकर्षक कपडे घालणे, makeup करणे, perfume लावणे, आपण आकर्षक दिसावे म्हणून नियमित व्यायाम करणे, ह्या सर्वांची आता गरजच राहिली नाही.   Facebook वर सर्व किती सुंदर आणि आकर्षक दिसतात नाही! कारण प्रत्येकाने आपला एक सुंदर profile picture निवडलेला असतो ना! मी तर माझा सुंदर, आकर्षक फोटो शोधण्यासाठी मी तर - दिवस घालवले, शेवटी beauty parlour मध्ये गेले.

समीर: नंतर एक सुंदर फोटो काढून घेतला असेल नाही?

Mrs. Arora: नाही हो! त्या  beauty parlour मधील एका सुंदर मुलीचा फोटो काढला आणि तो माझ्या profile picture वर upload केला

समीर: तुमच्या मित्रांनी त्या फोटोवर काही comments केल्या नाहीत काय?कारण तुमचे वय आणि फोटो ह्यातील तफावत कोण्या मित्राच्या लक्षात आली नाही काय?

Mrs. Arora: अहो! तीच तर गम्मत आहे. मी स्वतःला इतके सुंदर, आकर्षक आणि fit ठेवण्यासाठी मी काय आहार घेते, कोणता व्यायाम करते, कोणत्या parlour मध्ये जाते, तळवलकर जिम, ह्या सर्वांबाबत मी Facebook वर उपलोड करत असते ना!

समीर: पण, Facebook मुळे  काही समस्या निर्माण होऊ शकते आणि त्याचे निराकरण करण्यासाठी ह्या केंद्रात जाणे गरजेचे आहे असे तुम्हला का आणि केव्हापासुन वाटावयास लागले?

Mrs. Arora: ह्या रविवारी, रात्री मी नेहमीप्रमाणेच  Facebook वर होते. टेबल वर माझ्या नवऱ्याने लिहिलेली चिट्ठी दिसली. "मी दिवसांपूर्वीच घर सोडून निघून गेलेलो असेन, तुझ्या माहिती साठी फक्त" अहो  एका घरात राहताना फक्त एक महिना मी त्यांच्याशी बोललेली नसेन, म्हणून काय असा मुर्खासारखा निर्णय  घ्यावयाचा

समीरबरे, मग, तुम्ही काय केलेत?

 Mrs. Arora: काहीच नाही, " I unfriended him, offcourse"


एक अनुवादित अनुभव. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा  वाईटच. "Facebook" " a love and hate relationship".  

Wednesday, July 18, 2012

महाभारत



देवांची आपसात होणारी बौद्धिक चर्चा आणी त्या चर्चेतून प्राप्त होणारे, जीवनाचा अर्थ समजावून सागणारे संदेश, ह्या  सर्वांचे संकलन म्हणजेच "वेद". ह्या वेदांच्या माध्यमातून आणी ह्या वेदांचे मानवानी आकलन करून, त्यांचा अर्थ समजून एक चांगले अर्थपूर्ण जीवन जीवन जगण्यासाठी, मानवी समाजाची निर्मिती करण्याकरिता देवानी सात ऋषींना पृथ्वीवर पाठविले. ह्या ऋषींनी वेदांच्या तत्वांवर आधारित समाजाची निर्मिती केली. "ब्राम्हण" , "क्षत्रिय", " वैश्य", "शूद्र", हे समाजाचे चार "वर्ण" देखील ह्या  ऋषींनी निर्माण केलेत.  अनेक वर्षे अश्या प्रकारची समाजरचना सुरु होती. त्यानंतर सतत १४ वर्षे फार मोठा दुष्काळ पडला. समाजरचना संपूर्ण कोलमडून पडली. "वेद" आणी त्यांचा अर्थ लोक विसरून गेलेत. १४ वर्षानंतर शेवटी पाउस पडला. 

एका कोळीणीचा (सत्यवती)  मुलगा म्हणजे "कृष्ण द्वैपायन" जे नंतर "व्यास ऋषीं" म्हणून ओळखले गेलेत, त्यांनी पुन्हा सर्व वेदांच्या श्लोकांचे संकलन करण्यास सुरवात केली. सात ऋषींपैकी वशिष्ठ ऋषींचा नातू पराशर ऋषींचा मुलगा हे "व्यास ऋषीं". व्यास ऋषींच्या  जन्माची कथाही फार मजेदार आहे. शंतनू  राजाला गंगेपासून झालेला मुलगा हा गंगापुत्र देवव्रत  (भीष्म). शंतनू  नंतर सत्यवती ह्या  कोळीणीच्या प्रेमात पडला. उपरीचार राजाची सत्यवती ही कन्या. उपरीचार राजा एकदा जंगलात शिकारीला गेला. जंगलात त्याला आपल्या पत्नीची एवढी आठवण आली कि excite होवून त्याचा वीर्यपात झाला. वीर्य वाया जावू नये म्हणून त्याने ते एका पानात जमा केले, पान व्यवस्थित बांधून आपल्या पाळीव पोपटाला ते नेण्यास, आणी, आपल्या पत्नीला देण्याची सूचना केली. पोपट ते वीर्य घेवून उडाला, आकाशात एका ससाण्याने पोपटावर हल्ला केला. पोपटाच्या चोचीतील पानात ठेवलेले वीर्य एका नदीत पडले, नदीतील एका मासोळीने ते सेवन केले (ही मासोळी एक शापित अप्सरा होती).  त्या मासोळीला एक  मुलगा आणी एक मुलगी झाली. मुलाला नंतर  उपरीचार राजाने स्वतः चा मुलगा म्हणून स्वीकार केला, परंतू मुलीचा स्वीकार करण्यास नकार दिला. हि मत्स्यकन्या म्हणजेच सत्यवती. नदीतून  ती एका नावेतून लोकांना एका तीरावरून दुसऱ्या तीरावर नेण्याचे काम करायची. एकदा तिच्या बोटीतून पराशर ऋषीं प्रवास करीत होते. पराशर ऋषींनी सत्यवतीच्या सौंदर्यावर  लुब्ध होवून तिच्यासोबत समागम करण्याची इच्छा प्रकट केली. समागम केल्यानंतर त्यांच्या  सामर्थ्याने क्षणातच सत्यवतीला पराशर  ऋषींपासून पुत्र झाला, हा पुत्र म्हणजेच "व्यास ऋषीं".  नंतर पराशर ऋषींनी सत्यवतीला वर दिला कि तिच्या शरीराचा माश्याचा वास न येता मोहित करणारा सुगंध येईल आणी मुलगा जरी झाला तरी ती तिचे लग्न होईपर्यंत तिचे कौमार्य अबाधित राहील. ह्याच मत्स्यगंधा सत्यवतीचे पुढे राजाशी लग्न होवून ह्या दोघांपासून त्यांना झालेला पुत्र हा राजा "विचित्रवीर्य" आणी  विचित्रवीर्याचे पुत्र हे पांडू आणी धृतराष्ट्र (ह्यांच्या जन्माची देखील एक वेगळीच मजेदार कथा आहे). शंतनुला गंगेपासून झालेला पुत्र देवव्रत हा जेष्ठ पुत्र असल्यामुळे तोच भविष्यात राजा होईल म्हणून लग्न करण्यापूर्वी सत्यवतीने शंतनुला अट घातली कि जर तिचा पुत्र हा राजा होणार असेल तरच ती शंतनूशी विवाह करेल. जेष्ठ पुत्र देवव्रत ला जेव्हा हे कळले तेव्हा त्याने प्रतिज्ञा केली कि सत्यावातीचा पुत्रच राजा होईल तसेच तो आजन्म ब्रह्मचारी राहील जेणेकरून सत्यवतीच्या पुत्राचे पुत्र भविष्यात राजसिंहासन चालवतील. हीच ती भीष्मप्रतिज्ञा. त्यामुळेच देवव्रत पुढे   भीष्म ह्या नावाने परिचित झालेत.  

"व्यास ऋषीं" नंतर "वेदव्यास" ह्या नावाने ओळखू जावू लागले. व्यासांनी सर्व वेदांच्या श्लोकांचे संकलन करण्यास सुरवात केली. देवांची स्तुती करणाऱ्या ह्या श्लोकांचे चार विभाग केलेत, हे चार विभाग म्हणजेच -- "ऋग्वेद", "यजुर्वेद", "सामवेद" आणी "अथर्ववेद". ह्या वेदांतील श्लोकाचा अर्थ अगदी सरळ सोप्या भाषेत, काव्य/कथा स्वरुपात सर्वसामान्य लोकांना समजावा, ही इच्छा त्यांनी देवांपुढे प्रकट केली. व्यासांची संकल्पना मूर्त स्वरुपात साकार व्हावी म्हणून, व्यासांनी कथन केलेले लिहिण्यासाठी गणेशाची नियुक्ती करण्यात आली. व्यासांनी काव्य/कथा स्वरुपात कथन केलेले आणी गणेशाने लिहिलेले काव्य म्हणजे "जय", विजयाचे आख्यान. मुळात  ह्याचे ६ आध्याय  होते, परंतू त्यातील एकाच आध्याय कालांतराने मानावांपर्यंत, व्यासांच्या वैशंपायन ह्या शिष्यामार्फात पोहचला. 

व्यासांनी सांगितलेले आणी गणेशानी लिहिलेले काव्य,  नंतर एका पासून दुसऱ्या पर्यंत पोहचताना त्यात नवीन नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला. कालांतराने "जय" ह्या मुळ काव्याला "विजय" ह्या नावाने ओळखले जावू लागले. भारत राजाने त्यात १००००० श्लोकांचा समावेश करून हेच काव्य नंतर "भरत" नावाने ओळखले जावू लागले. कालांतराने कृष्णजन्माची आणी नंतर कृष्णाच्या अनेक कथांचा ह्यात समावेश करून हे काव्य "महाभारत" म्हणून लोकांपर्यंत पोहचले. 

देवदत्त पटनायक ह्या वैध्यकीय चिकित्सकाने लिहिलेल्या "जय -- महाभारत कथा" ह्या पुस्तकातील महाभारताच्या ग्रंथाच्या निर्मितीची ही कथा. एका वैध्यकीय चिकित्सकाने महाभारतावरील लिहिलेले हे पुस्तक अतिशय सोप्या इंग्रजी भाषेतील असून, सर्वांनी वाचावे असे आहे. महाभारतातील कथांचे अतिशय इंटरेस्टिंग असे वर्णन ह्यात केलेले आहे. ह्याच लेखकाने अशाच प्रकारची पौराणिक कथांवर आधारित ४ पुस्तके लिहिलेली आहेत. 

व्यासांनी  ही कथा त्यांच्या मुलाला देखील सांगितली, ही कथा सांगताना जैमिनी ह्या त्यांच्या शिष्याने देखील ऐकली. परंतु ह्या काव्यांचा अर्थ न समजल्यामुळे जैमिनी अर्थ समजावून घेण्यासाठी मार्कंडेय ऋषींकडे गेला. परंतु ऋषींनी मौनव्रत धारण केल्यामुळे, त्यांच्या  शिष्याने  एक पक्षाकडे जैमिनीला जाण्याची सूचना केली (त्या काळी असे पक्षी म्हणजे गंधर्व किंवा अप्सरा, देवांच्या शापाने पक्षी झालेले असायचे, परंतू त्यांना मानवासारखे बोलता यायचे).  पुन्हा एक गमतीदार कथा .... महाभारताचे युध्द सुरु असताना ही पक्षिणी आकाशात उडत होती. तिच्या पोटात चार अंडी होती. युध्द सुरु असताना एक बाण ह्या पक्षिणीच्या पोटात शिरून तिचे पोट फाटले आणी त्यातील चार अंडी जमिनीवर पडली. जमिनीवर रक्त-मासांचा आणी हत्ती, घोड्यांच्या विष्टेचा चिखल झालेला होता म्हणून अंडी फुटली नाहीत. त्यातून पिले बाहेर निघाली. त्यांच्या आईने ही अंडी पोटात असताना व्यासांचे " जय" काव्य आणी त्यांचा अर्थ ह्या अंड्यातील गर्भाना सांगितला होता. ह्या पिल्लांनी नंतर संपूर्ण १८ दिवसांच्या महाभारताच्या युद्धाचे प्रत्यक्षदर्शी वर्णन आणी "जय" काव्य जैमिनीला समजावून सांगितले. त्यामुळे नंतर व्यास ऋषींनी सांगितलेल्या "जय" काव्यात महाभारताच्या युद्धाचा देखील समावेश करण्यात आला. ह्याच पुस्तकात  महाभारतातील पौराणिक कथांकडे भारतातील प्रत्येक राज्ज्यात कश्या दृष्टीकोनातून बघितल्या जाते ह्याचे देखील उत्तम विश्लेषण केलेले आहे. 

Tuesday, June 26, 2012

Witch Hunting





४० वर्ष वयाची रामकली मध्य प्रदेश राज्ज्यातील सिधी जिल्ह्यातील सेन्द्वा गावात राहणारी एक आदिवासी महिला. रामकलीच्या सासर्यांना दोन बायका, पहल्या बायकोची ३ मूले आणी दुसऱ्या बायकोची 5 मूले. पहिल्या बायकोचा मुलगा जगन्नाथ हा  रामकलीचा पती. रामकलीच्या सासर्यांनी त्यांच्या ८ मुलांमध्ये जमिनीची वाटणी केलेली. रामकली आणी तिचा नवरा बंसगोपाल त्यांना मिळालेल्या जमिनीवर शेती करून आपली उपजीविका भागवीत होते. परंतु भावाभावात जमिनीवरून वाद आणी भांडण ही नेहमीच व्हावयाचे. बंसगोपाल चा काका जयकरण  ह्याचाही  बंसगोपालच्या शेतीवर डोळा होताच. आणी ह्या सर्व वादावादी साठी रामकलीच जबाबदार ठरवून तिला नेहमीच मारहाण आणी शिवीगाळ व्हावयाची. 

२००५ मध्ये  जयकरण चा मुलगा बाबा आजारी झाला. आदिवासी समाज, अंधश्रद्धेचा जबरदस्त पगडा, डॉक्टर पेक्षा वैदूवरच  जास्त विश्वास, बाबाची प्रकृती जास्तच गंभीर झाली, आणी ह्यातूनच अफवा निर्माण व्हावयाला सुरवात झाली. रामकली ही जादू-टोना करणारी चेटकीण असून तिनेच बाबावर काळी जादू केल्यामुळे बाबा आजारी झालेला आहे. खरे तर बंसगोपालच्या भावांचा त्याच्या शेतीवर डोळा होता आणी रामकली ह्यात एक महत्वाचा अडसर आहे अशी त्यांची ठाम गैरसमजूत, त्यामुळे रामकलीला बदनाम करण्याची ही नामी संधी. गावात जात पंचायत बोलाविण्यात आली, रामकली आणी तिच्या पतीला पाचारण करण्यात आले. रामकली ही चेटकीण असून तिनेच बाबावर  काळी जादू केल्यामुळे बाबा आजारी झालेला आहे हा  आरोप तिच्यावर ठेवण्यात आला, आरोपाचा तिने इन्कार केल्यानंतर तिला मारहाण करण्यास सुरवात झाली, अंगावरील कपडे काढून तिला अमानुष पणे मारहाण करून, जबरदस्तीने मल-मुत्र पाजण्यात येवून तिला फासावर लटकविण्याचा प्रयत्न करण्यात आला. कशीबशी स्वतःची सुटका करून रामकली पळून गेली.

एका सेवाभावी संस्थेच्या मदतीने रामकलीने  पोलीस मध्ये तक्रार केली, पोलिसांनी बंसगोपालच्या  भावांना अटक करून दोन दिवसांनी सोडून दिले. २००५ ते २०१० ह्या कालावधीत कोर्टकेस सुरु आहे, निर्णय झालेला नाही, रामकली आणी तिचे कुटूंब गावाबाहेर राहून आतिशय दहशतीत आणी लाचारीने आपले जीवन जगत आहेत. 

२१ व्या शतकातील ही घटना अविश्वसनीय आणी अंगावर शाहरे आणणारी. आणी, दुर्दैवाने ही एकाच घटना नाही. स्त्रियांवरील अत्त्याचाराचे विरोधात आम्ही Action
Aid  ह्या संस्थे सोबत  मध्य प्रदेश राज्ज्यातील सिधी, सिंग्रोली आणी छतरपूर ह्या जिल्ह्यात काम करीत आहोत. Witch  Hunting  ह्या   विषयवारील अभ्यास करताना पोलीस रेकोर्ड नुसार मध्य प्रदेश मधील तीन जिल्ह्यात आणी छातीसगड राज्ज्यातील तीन जिल्ह्यात अश्या ६६ दुर्दैवी घटनांचा अभ्यास करून आम्ही एक पुस्तक देखील प्रकशित केलेले आहे. आणी हे एक हिमनागाचे  आपणाला दिसणारे एक टोक आहे. अश्या कितीतरी घटनांची नोंद देखील झालेली नसेल. चेटूक, अंधश्रद्धा, जादू टोना ह्यांचा आधार घेवून ह्यासाठी फक्त स्त्रियांनाच दोषी ठरवून त्यांचावर आत्त्याचार करणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीला काय म्हणावे? रामकली सारख्या किती तरी स्त्रिया चेटूक करणाऱ्या आहेत ह्या अंध विश्वसापोटी मारल्या जात असतील किंवा एक उपेक्षित जीवन जगत असतील?   

Wednesday, November 23, 2011

Helicopter Parents


सुमीत हा ५ वर्षांचा त्याच्या पालकांचा एकुलता एक मुलगा. आतिशय प्रेमात आणी पालकांच्या सतत देखरेखीत त्याचे संगोपन. त्याने काय खेळावे, खेळू नये, काय खावे, काय खाऊ नये, कोणासोबत खेळावे हे सर्व निर्णय पालकांचेच, त्याच्या आरोग्याची, वाढ विकासाची त्यांना इतकी काळजी कि स्वतः च नीरनिराळी पुस्तके वाचून त्याला रोज ३-४ प्रकारच्या बाटल्यातील protiens आणी vitamins अगदी काळजीपूर्वक देणारे. रोज संध्याकाळी त्याला बगीच्यात फिरवायला नेताना सोबत पाण्याची एक बाटली आणी खेळताना हाताला थोडी देखील माती लागल्यास लगेचच हात पाण्याने धुणारे. प्रकृतीत थोडा देखील बदल जाणवल्यास रात्र रात्र जागून काढणारे. आणि ह्या सर्व कार्यात नातवावर डोळ्यात तेल घालून सतत लक्ष ठेवणारे, सतत सल्ला देणारे आजी आजोबा. एकदा तर सुमित बगीच्यात खेळताना त्यांना एक गांडूळ दिसले आणी तेव्हापासून त्यांनी सुमितला त्या बगीच्यात नेणेच बंद केले. १९९० च्या दशकात क्लायीन आणी फाय ह्या दोन मानसोपचारतज्ञांनी "Helicopter Parents " ही संकल्पना प्रचलित केली. मुलांची वाजवीपेक्षा जास्त काळजी घेणारे, त्यांच्या बारीक सारीक वर्तणुकीवर सतत लक्ष ठेवणारे आणी नियंत्रण ठेवणारे, दैनंदिन जीवनात मुलांनी कसे वागायला हवे हे स्वतः च ठरविणारे पालक म्हणजेच "Helicopter Parents ". जास्तीत जास्त वेळ मुलांच्या संगोपनातील नियोजनात, ते नेहमीच सुरक्षित कसे असावेत, त्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल, आणी त्यांच्या काळजीत, अश्या प्रकारचे पालक आपला जास्तीत जास्त वेळ घालवतात आणी त्या बद्धल इतरांना अभिमानाने सांगत देखील असतात. अपत्त्यावरील प्रेम, आणी आपला मुलगा/ मुलगी सर्व बाबतीत इतरांपेक्षा उत्तमच असावी ह्या सततच्या जाणीवेतून त्यांची ही वर्तणूक. शाळेतील प्रवेशापासून, मुलांनी कोणते विषय निवडावेत, त्यांनी कोणत्या कॉलेजात प्रवेश घ्यावा, कश्या प्रकारे अभ्यास करावा , कोणते profession निवडावे, आणी नंतरही त्यांच्या प्रगतीची दिश कोणती असावी, हे सर्व फक्त पालकांचेच निर्णय, आणी ह्या निर्णयांची अंमलबजावणी करतना प्रत्येक गोष्टीत सूक्ष्म नियोजन करण्यात स्वतः ला धन्य समजणारे हे पालक म्हणजेच "Helicopter Parents ". स्वतः चा शोध घेवून, मला काय हवे, काय नको, मला काय करायला आवडते, ही विचारक्षमताच निर्माण करण्याची, स्वतः चे निर्णय स्वतः च घेण्याची क्षमताच निर्माण करण्यासाठी मुलांना संधीच न देणारे हे पालक.

उद्धेश जरी खूप चांगला असला तरी, ह्या अश्या वर्तणुकीचा बर्याच मुलांच्या सर्वांगीण विकासावर होणारा दुष्परिणाम:

स्वतः च नवीन नवीन गोष्टी शिकण्यापासून तथा काही अभिनव संकल्पना आमलात आणण्यापासून ही मूले सतत वंचित राहतात.
पालकांचेच एक Clone म्हणून विकास होणारी हे मूले.
भविष्यात निर्माण होणारा निर्णय क्षमतेचा अभाव आणी अगदी छोट्या छोट्या बाबींसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची वृत्ती.
केलेल्या चुकांमधून शिकण्याची संधी प्राप्त न होणे.
जीवनातील अनाकलनीय, अकल्पित, आकस्मिक घटनांना सामोरे न जाण्याची क्षमता. छोट्याशाही प्रतिकूल परिस्थितीला ध्यर्याने सामोरे न जाण्याची क्षमता आणी त्यातून सतत ताण तणावात राहण्याची वृत्ती.
लहानपणी खूप प्रेम, पालकांचे सततचे केंद्रित लक्ष, जे पहिजे ते मिळणारी ही मूले मोठेपणी मात्र एक पंगुत्व घेवून सतत कोणत्यातरी दडपणाखाली जीवन जगत असतात
आत्मकेंद्रित, नेहमी सहकार्यांपासून दूर राहण्याची प्रवृत्ती आणी त्यामुळे इतरांच्या टीकेचे, अवहेलनेचे लक्ष झालेल्या ह्या व्यक्ती. मानसिक आजार निर्माण होण्यासाठी अगदी अनुकूल प्रवृत्ती.
"Helicopter Parents " ह्या पदवी पासून दूर ठेवावयाचे असल्यास पालकांना काय करणे शक्य आहे?

मुलांच्या विकासाचा अर्थ - त्यांना जसे हवे तसे खेळू द्या. प्रसंगी खेळताना पडले, खरचटले, जखम झाली, इतर मुलांशी भांडणे झालीत, मारा माऱ्या झाल्यात म्हणून त्यांना १००% सुरक्षा मिळण्यासाठी खूप बंधने घालू नयेत.
मुलांना स्वतंत्रता: वयानुरूप त्यांना त्यांच्या वागण्यात स्वतंत्रता असू देणे
मुलांच्या सर्वांगीण विकासात "Helicopter Parents " चे बरेच गुण असणे चांगलेच ठरते, परंतू कोणत्या गोष्टींचा अतिरेक होतोय हे समजून त्या प्रमाणे आपल्या वर्तणुकीत सुधारणा करणे आवश्यक ठरते.
"Helicopter Parents " बनताना बर्याच वेळी पालक स्वतः च्या आवडी निवडी, स्वतः चे सामाजिक जीवन , स्वतः चे वयक्तिक आयुष्य देखील compromose करतात. हे कसे टाळता येईल ह्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणे.
मुलांना अपयशी होऊ द्या : अपयशातील अनुभवानवरूनच मूले शिकतील, त्यासाठी त्यांना संधी द्या, गरज भासल्यास मदत करा.
तुम्हाला तुमच्या लहानपणी जे काही मिळाले नाही ते सर्व आपल्या मुलांना मिळालेच पाहिजे हा अट्टाहास बाळगू नका.
वाट बघण्याची संधी: मुलांनी कोणत्याही गोष्टीचा आग्रह केला कि त्यांना तो गोष्ट तत्काळ उपलब्ध केलीच पाहिजे, हे टाळता येईल काय. मुलांना थोडी वाट बघण्याची सवय लावणे.
हे सर्व काही एक medical prescription नाही. प्राप्त परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेवून स्वतः च्या वर्तणुकीत आवश्यक सुधारणा करून त्यात सातत्य बाळगल्यास मुलांच्या योग्य विकासात पालकांचा महत्वाचा वाटा ठरू शकतो ह्यात कोणतेच दुमत नाही ( UNDP च्या ताण तणाव परामर्षक प्राची ह्यांचे लेखावर आधारित)

Saturday, October 8, 2011

Be Nice ; just do not be - "too nice "

काही व्यक्ती वाजवीपेक्षा फारच चांगल्या असतात. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी सर्व प्रथम धावून जाणाऱ्या, कोणतीही मदत लागल्यास, सर्व प्रथम त्या व्यक्तीच्या पाठीवर मदतीचा हात ठेवणाऱ्या, समोरील व्यक्तीचे दुखः हलके करण्यासाठी स्वतः चा खांदा पुढे करणाऱ्या, अश्या ह्या व्यक्ती. कोणतीही मदत लागल्यास, "मै.. हू.. ना..." असा ह्यांचा, त्यांचे निकटवर्तीय समाजात असणारा लौकिक. इतरांच्या गरजांना स्वतः च्या गरजांपेक्षा नेहमीच प्राथमिकता देणे, अशी ह्यांची वृत्ती. स्वतः ची मत, स्वतः ची प्राथमिकता, स्वतः च्या इच्छा/अपेक्षा कोणासमोरही प्रदर्शित न करणाऱ्या. आज संध्याकाळी काय करीत आहात? असा प्रश्न त्यांना विचारल्यास, त्यांचे उत्तर, " काही नाही, सांगा ना? आपले काही काम आहे काय? मी तयार आहो, आपणास काही मदत हवी असल्यास". ३-४ व्यक्ती आपसात आपल्या भागातील श्री. जोशी ह्यांना सकाळी देवाज्ञा झाल्याची चर्चा करताना ही व्यक्ती ते ऐकते, श्री. जोशी ह्यांचेशी काही विशेष परिचय नसताना देखील आपली सर्व कामे बाजूला सारून तडक जोशी ह्यांचे घरी पुढील सर्व तयारी करण्यासाठी दाखल. पु. ल. देशपांडेच्या "व्यक्ती आणी वल्ली" ह्यातील नारायण सारखेच हे पात्र किंवा अश्या ह्या व्यक्ती. आपल्या समाजात, कार्य क्षेत्रात असले हे "नारायण" आपणास नेहमीच आढळतात. अर्थात, बदलत्या युगात ह्या नारायणांची संख्या कमी झालेली दिसत असली तरीही काही नारायण अजूनही शिल्लक आहेत. चांगले असणे, चांगले वागणे, सर्वांशी सौहार्दपूर्ण वर्तणूक ठेवणे, आवश्यकता भासल्यास इतरांना मदत करणे, ही सर्व वृत्ती निश्चितच चांगली आहे आणी निरोगी समाजासाठी अश्या वृत्तीच्या व्यक्ती देखील असणे आवश्यक आहेत. परंतू चुकीच्या व्यक्ती साठी देखील, चुकीच्या कारणांसाठी, आणी महत्वाचे म्हणजे सतत खूपच चांगले आणी चांगलेच वागणे हे योग्य आहे काय?, काही प्रसंगी नाही म्हणणे देखील योग्य ठरते काय? हा कदाचित चर्चेचा विषय ठरू शकेल.

काही व्यक्तींची मानसिकताच अशी तयार होत जाते कि ते नाही म्हणू शकतच नाही, किंवा त्यांना काय हव तो प्रश्न विचारण्याची हिम्मतच निर्माण होत नाही. कदाचित लहानपणापासून ते अश्या कुटुंबात वाढलेले असतात कि त्यांच्या मताला काहीच किंमत दिली जात नाही, आपली मत काय आहेत ते मांडण्याची त्यांना संधीच दिली जात नाही किंवा आपली मत प्रदर्शित करणे म्हणजे मोठ्यांना challenge करणे किंवा त्यांचा अपमान करणे, इतरांची मत, त्यांच्या मागण्या, स्वतः च्या मतापेक्षा किंवा स्वतः च्या मागण्यापेक्षा अधिक महत्वाच्या आहेत अशीच सतत शिकवण त्यांना दिली जाते. आणी ह्या सर्व मानसिकतेतून "नेहमीच चांगलेच वागणे" हा एक स्वभावाचा by product निर्माण होत असावा? परंतु अशे हे by product जर low self एस्टीम, passivity , fearfulness किंवा desperate loneliness हे स्वभाव गुण देखील त्या व्यक्तीत निर्माण करीत असतील किंवा ह्या ह्या स्वभाव गुणां मुळेच किंवा अतिशय भिडस्त स्वभावामुळे ती व्यक्ती जर "सतत फक्त आणी फक्त चांगलेच वागणे" ह्या वर्तणुकीची निर्माण होत असल्यास बरेच वेळा अशी व्यक्ती एक liability देखील ठरू शकते. आणी मग अश्या व्यक्तीला नेहमीच exploit करणाऱ्या व्यक्तींचा गोतावळा तिच्या आजूबाजूला गोळा झालेला दिसून येतो.

"सतत फक्त आणी फक्त चांगलेच वागणे" ह्या मागचे सत्य:
१. तुम्ही कोणालाही त्याचे चूक आहे हा प्रश्नच विचारू शकत नाही (you are not challenging ): काम झाल्यानंतर एक boring व्यक्ती म्हणून तुमच्याकडे बघण्याचा एक सर्व साधारण दृष्टीकोन
२. You are too available : इतरांच्या फायद्यासाठी स्वतः चा काहीही विचारच न करणे
३. निर्णय घेण्यास अक्षम: किंवा स्वतः पुढाकार घेवून कोणतेही कार्य करण्यास अक्षम. इतरांना आपण नेहमीच आवडावे म्हणून त्यांनाच पुढाकार घेवू देणे, निर्णय घेवू देणे आणी नंतर त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मात्र "मै.. हू.. ना...". कालांतरातून ह्या स्वभावामुळे निर्माण होणारी एक वैषम्याची भावना, " सर्व आपणाला फक्त वापरूनच घेतात"
४. तुम्ही नाही म्हणूच शकत नाही: इतरांच्या सर्व मातांना आणी सूचनांना तुम्ही फक्त "होयच" म्हणता आणी तुमच्या इच्छेविरुद्धही सतत कार्य करीत असता त्यामुळे तुमची स्वतः ची एक identity शिल्लकच राहत नाही.
५. तुम्हाला नेहमी "गृहीतच" समजल्या जाते
६. तुम्ही खूप विचार करता आणी तो फक्त इतरांचाच: ह्यामुळे तुमचे कुटुंबीय देखील तुमच्यावर सतत नाराज असतात आणी नेहमीच त्यांचेही बोलणे तुम्हालाच ऐकावे लागते.
७. तुम्हाला एखादे वेळी कोणी काम सांगितले नाही तर त्याचेही तुम्हाला वाईट वाटते, आपणाला टाळत तर नाही ना, ह्याचाच पुन्हा पुन्हा विचार. कोणत्याही निर्णय प्रक्रियेत तुम्हाला सहभागी करून घेतले जात नसल्यामुळे मी कोणाला दुखविले तर नाही ना ही भावना अधिकच बळावत जाते.

ह्या सर्व परिस्थितीतून बाहेर निघणे शक्य होईल काय? आहे कठीणच ... पण प्रयत्न तर निश्चितच करता येतील ना? काही सूचना:

१. छोट्याछोट्या बाबतीत निर्णय घेण्यास सुरवात करा आणी आपण घेतलेला निर्णय कसा योग्य होता आणी मी घेतलेल्या निर्णयामुळे मला जे अपेक्षित होत नेमक तेच कसे झाले हे सतत आठवत राहा. तुमच्या गरजा आणी प्राधान्य इतरांना सांगण्याचे धाडस करण्यास सुरवात करा.
२. स्वतः च्या हक्कांची प्रथम स्वतः ला जाणीव होऊ द्या, त्यावर बोलण्यास सुरवात करा, मुख्य म्हणजे तुम्हाला काय वाटत ह्यावर प्रश्न विचारण्यास सुरवात करा.
३. स्वतः च्या मर्यादा ओळखा: इतरांना मदत लागल्यास प्रत्येक वेळी आपण तेथे उपस्थित असूच शकणार नाही ही सत्त्यता समजून घ्या. " माझ्या शिवाय हे काम होणारच नाही" हे वाक्क्य आपल्या शब्दकोशातून नेहमीसाठी गाळून टाका. "कोणाचेच kona वाचून अडत नाही", हे नवीन वाक्क्य आपल्या शब्दकोशात लिहा.
४. हळू हळू इतरांना न दुखावता "नाही" म्हणण्यास शिका, ह्यासाठी प्रसंगी थोड खोट बोलावे लागले तरी चालेल
५. " You Before the World " : रोज सकाळी उठताना आज मी कोणती एक गोष्ट फक्त माझ्या आणी माझ्या साठीच करणार अहो ह्याची खुणगाठ मनाशी बांधून ती गोष्ट दिवसभरात पूर्ण करा, रात्री झोपताना तीच गोष्ट आठवा आणी त्याचा आनंद साजरा करा. इतरांनी आपणास काही प्रश्न विचारण्यापूर्वी आपणास त्या व्यक्तीकडून काय हवे हा प्रश्न विचारण्याचे धाडस करण्यास सुरवात करा.
६. Develop a healthy disregard : तुम्ही सदा सर्वदा सर्वांनाच आनंदी, समाधानी करू शकणार नाही हे सत्त्य सतत मनात बाळगा.
७. इतरांशी चांगले वागा आणी चांगली कामे देखील करा पण सर्वंकष विचार करून तुम्हाला त्यातून आनंद मिळत असल्यास,"त्याला काय वाटेल हे विचार करणे टाळा"
Be Nice ; just do not be - "too nice ". Be yourself - its your best chance of success

(UNDP च्या ताण/तणाव परमार्षक प्राची ह्यांचे लेखावर आधारित)

Friday, September 30, 2011

दृष्टीकोण



संगणकासाठी लागणारे साहित्त्य, उपकरणे निर्मिती करणारा एक तरुण उद्ध्योजक. व्यवसायातील मंदी मुळे त्रस्त झालेला. कर्जाचा डोंगर, कच्चा माल पुरविणाऱ्या पुरवठाधारकांचा पैश्याकरिता सततचा तगादा. ह्या सर्व दुष्टचक्रातून कसा मार्ग काढावा त्याल काहीच कळत नव्हते. एक दिवशी असाच तो आतिशय उदास होवून डोक्यावर हात ठेवून बगीच्यात बसलेला होता, ह्या सर्व विपरीत आर्थिक परिस्थितून बाहेर कसे निघता येईल ह्याचाच विचार करीत होता. अचानक एक म्हातारी व्यक्ती त्यचे समोर उभी ठाकली. " तुला कोणती तरी फार मोठी चिंता किंवा समस्या भेडसावीत असावी असे मला वाटते, तो व्यकी म्हणली"

कोणापाशी तरी आपली समस्या कथन करावी, आपले दुखः हलके करावे ह्या भावनेतून त्याने आपल्या व्यवसायाबाबत सर्व काही त्या म्हातारया व्यक्तीला सांगितले. सर्व ऐकून ती म्हातारी व्यक्ती म्हणली, " मला तुझी समस्या कळलेली आहे, आणी मला वाटत मी तुला निश्चितच काही तरी मदत करू शकेन" . त्या म्हातारया व्यक्तीने त्या उद्धयोजकाचे नाव विचारले, खिशातून चेकबुक काढून त्याचे नावे एक चेक लिहून सही करून त्याचे हातात दिला आणी म्हणला, " हे पैसे असू दे, एक वर्षानंतर ह्याच दिवशी, ह्याच जागी आणी ह्याच वेळी तू मला भेट आणी मी दिलेले पैसे मला परत कर" . आणी तो जसा आला तसाच एक क्षणात पुढे काहीही ना बोलता निघून गेला आणी गायब झाला. उद्ध्योजाकाने कुतूहलापोटी तो चेक पहिला, त्याचे नावाने ५ लाख डॉलर चा तो चेक होता, सही च्या काही टायीप केलेले नाव होते, " डॉ. जॉन डी रॉकफेलर" , जगातील प्रसिद्ध अशी एक श्रीमंत व्यक्ती. ह्या पैशाने माझ्या सर्व आर्थिक विवंचना दूर होतील आणी माझा व्यवसाय पुन्हा नव्या जोमाने मला सुरु करता येईल, ह्याची जाणीव होवून तो आतिशय उत्साहित झाला. व्यवसायातील समस्या दूर करून अभिनव संकल्पना राबवून आपला व्यवसाय नजीकच्या कालावधीत आर्थिक दृष्ट्या कसा संपन्न करता येईल ह्याचे एक स्पष्ठ चित्र त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले. अगदी खूपच गरज भासली तरच हा चेक वटवून त्या पैश्याचा मी उपयोग करेन ही खुणगाठ मनाशी बांधून त्याने तो चेक एका पेटीत ठेवून दिला. गरज भासली तर आपल्याजवळ पैसा उपलब्ध असेल ह्या उत्साहाने, व्यवसायातील बारीक सारीक बाबींचे अतिशय सूक्ष्म अवलोकन करून, एक निश्चत आराखडा तयार करून नव्याने व्यवसायाला सुरवात केली. ज्या व्यवसायाच्या बाबीत तोटा होत आहे त्या बंद करून ज्या बाबीत आपणास नफा होऊ शकेल त्याच बाबी करण्याचा एक सकारात्मक दृष्ट्कोन ठेवून, नव्या उत्साहाने व्यवसाय सुरु केला. छोट्या छोट्या बाबीतून थोडासा फायदा, ह्या फायद्याचे योग्य कार्य नियोजन, असे करत करत सहा महिन्यातच त्याचे नुकसान भरून निघाले. पुढे अधिक उमेदीने व्यवसाय करून, एका वर्षात त्याच्या व्यवसायात भरभराट होवून त्याला भरपूर पैसा मिळाला.

वर्षाचे शेवटी, पेटीतील तसाच ठेवून दिलेला चेक बाहेर काढून, ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी, त्याच बगीच्यात तो चेक परत करण्या साठी त्या म्हातारया व्यक्तीला भेटण्याकरिता तो गेला. ठरलेल्या वेळी ती म्हातारी व्यक्ती देखील उपस्थित झाली. संपूर्ण वर्षातील आपली यशोगाथा सांगून, त्या व्यक्तीचा चेक वापस करून त्याचे आभार व्यक्त करण्यासाठी तो बोलण्यास सुरवात करणार तेवढ्यातच एक नर्स धावत आली. त्या म्हातारया व्यक्तीचा हात धरून म्हणली, " परमेश्वरा, तुझे आभार मानते, हे म्हातारे आजोबा आज लवकरच सापडले, खूप शोधावे नाही लागले", आणी ती नर्स त्या व्यावसायिकाला म्हणली, " मी आपली क्षमा मागते, ह्या आजोबांनी आपणाला त्रास तर नाही ना दिला?, हे आजोबा जवळच एका वृद्धाश्रमात राहतात, असेच मधून मधून कोणालाही न सांगता निघून जातात, बागेत लोकांना भेटतात आणी मी डॉ. जॉन डी रॉकफेलर आहे असे सांगत असतात" . आणी आजोबांचा हात धरून ती नर्स निघून गेली.

त्या व्यावसायिकाला तर आश्चर्याचा धक्काच बसला, संपूर्ण मन आणी शरीर बधीर झाल्यासारखे वाटले त्याला. आवश्यकता भासल्यास आपणाजवळ ५ लाख डॉलर आहेत ह्या एकाच धीरामुळे, नव-नवीन कार्य योजना आखून, त्यांची अंमलबजावणी करून आपण तोट्यात असणारा उद्योग फायदेशीर करू शकलो, त्याचे त्यालाच आश्चर्य वाटले. आणी अचानक त्याला जाणीव झाली, हा पैसा किंवा पैसा जवळ असल्याची केवळ भावना, तो आपण न वापरता, स्वकर्तुत्वावर, सकारात्मक दृष्टीकोन ठेवून केलेलीकार्य योजना आणी त्याची योग्य अंमलबजावणी हेच आपल्या यशाचे गमक होते. आणी सहजच मनात एक विचार देखील आला, " जर त्या दिवशी आपण तो चेक आपल्या खात्यात जमा केला असता आणी ते पैसे आपल्या खात्यात जमा न झाल्याचे दुसऱ्या दिवशी आपणास कळले असते तर?"